Skip to main content

डिजिटल लर्निंगचे धडे गिरवूया, स्मार्ट विद्यार्थी घडवूया!

 Brixlelant फाउंडेशन सेवाभावी सामाजिक संघटना आहे.ही संस्था अमेरिकेतील अनिवासी तरुणांच्या प्रोत्साहन आणि प्रयत्नातून उदयास आली आहे. तिचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. संस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासण्याच्या हेतूने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना डिजिटल ई-शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी क्यूजली (Qeasily) नावाचे ऍप आणले आहे. ऑनलाइन शिक्षणावर भर देत स्मार्ट विद्यार्थी आणि स्मार्ट शाळा घडवण्याच्या मार्ग दाखवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे 
Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students
 त्यासाठी ब्रिक्सेलेंट Qeasily.com या कंपनीचे सहकार्य घेतले आहे, संस्थेने घोषणा केली आहे की डिजिटल शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आगामी काळात 1 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. ब्रिक्सेलेंट अभ्यासक्रमावर आधारित सर्वसामग्री ही शाळा आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य , डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देेत आहे. त्यातून विद्यार्थी शाळा, शिक्षक यांना एक व्यासपीठ आणि आवश्यक अभ्यासक्रमाचे समाधान प्राप्त करता येणार आहे, त्याला विद्यार्थी, शिक्षक  व शाळेच्या विश्वस्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

 क्यूइझिलीचे 50 हजार वापरकर्ते

Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students
संस्थेने घोषणा  केली आहे, की डिजिटल शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आगामी काळात 1 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. ब्रिक्सेलेंट अभ्यासक्रमावर आधारित सर्वसामग्री ही शाळा आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य व डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देेत आहे. त्यातून विद्यार्थी शाळा, शिक्षक यांना एक व्यासपीठ आणि आवश्यक अभ्यासक्रमाचे समाधान प्राप्त करता येणार आहे,  त्याला विद्यार्थी,शिक्षक आणि शाळेच्या विश्वस्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  आतापर्यंत ऍपवर 50 हजार वापरकर्त्या विद्यार्थ्यांची संख्या नोंदवली गेली आहे. 

ही सेवा सर्वांसाठी विनामूल्य आणि डिजिटल शिक्षणास पाठिंबा देण्यासाठी महत्वाची ठरेल त्यासाठी अतिरिक्त पाठ्यक्रम अभ्यासक्रमांचा कॅटलॉग बाजारात आणण्याची ही कंपनीची प्रक्रिया सुरू आहे. असे न्यूयॉर्क मधील संस्थापक मिलिंद महाजन यांनी दिलेल्या यांनी म्हटले आहे, महसूल हा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा असला तरी आमचे मुख्य लक्ष विनामूल्य शिक्षण उपलब्ध करण्यावर आहे. जे शाळा आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students
Add caption

Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students

क्यूइझिली कंपनी इतर कंपन्यांपेक्षा भिन्न आहे, ज्यात भाषेसह सर्व प्रकारच्या व्यापक सामग्रीवर Qeasily. Com क्यूइझिलीने लक्ष केंद्रित केले आहे. दहा लाखा-पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या 800 हुन अधिक शाळांची मान्यता मिळण्यास आम्ही यशस्वी झालो असे संस्थापक अरविंद सोनवणे म्हणाले, "जमा झालेल्या पैशांचा अंशतः उपयोग यूजरबेससाठी केला जाईल." त्याने आणखी  विद्यार्थी  जोडले जातील,  सद्या किफायतशीर इंटरनेट, स्मार्टफोनची विस्तृत उपलब्धता आणि जागरुकता वाढल्याने शाळा आणि पालकांना आपल्या मुलांना चांगली संधी उपलब्ध करुन देता येणार आहे,  परंतु सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सोल्यूशन्सची किंमत ही मोठी अडथळा ठरत आहे.


Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students

महिला सक्षमीकरणाला चालना

 ब्रिक्सेलेंटची आणखी एक मूळ संस्थापक वैशाली वाघ ही गृहिणी उद्योजक बनत तीने ही शून्यापासून व्यवसाय सुरु केला आहे. सुरुवातीच्या दिवसापासून ती संस्थेचा भाग आहे आणि भारतीय महिलांना काय साध्य करता येईल हे त्यांनी दाखवून दिले आहे. ही महिला सक्षमीकरणाची वास्तविक जीवनातील घटना आहे.

Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students

संस्थापक मिलिंद महाजन, स्वाती महाजन, अरविंद सोनवणे, वैशाली वाघ यांच्यासह उपस्थित कुणाल सुतार, सचिन नाफडे, जयेश पाटील, अतुल सोनगीरकर, भूषण सावला, वंदना इटगी, चैताली बागुल, अश्विनी माळोदे, विद्या भोकरे, नितीका पाटील, कुणाल पाटील, संकेत काकडे, सचिन अटकरे, दिनेश साळवी आदी.(फोटो:टीम ब्रिक्सेलेंट)


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...