Skip to main content

दोस्त असावा तर असा

राजे तुमचा मान अबाधीत आहे. तुम्ही फडणवीसांप्रतिच्या मैत्रीला जसे जागलात तशीच मैत्री श्रीनिवास पाटील यांनी पवारांप्रति निभावली. मात्र पवार लोकभावाना ओळखणारे जाणतेराजे ठरले. तुमचा रोखठोक बाणा आहे, कदाचित तुम्ही फारसे राजकारण करत नसाल परंतु तुम्ही ज्या पक्षाकडून उभे होता त्यापक्षा विरुद्ध असलेली जनभावना ओळखू शकले नाहीत. असो राजे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या आणि तुमच्या मित्रत्वाबद्दल जाहिरपणे बोललात तुम्ही तुमची मैत्री जपली वाईट वाटून घेण्याचे कारण नाही.

dost-ho-to-aisaI
Imege source- google | image by manoramonline.com

हारजीत होत असतात, सत्ता येतजात राहते. परंतु माणसाने कायम जमिनीशी नाळ जोडून ठेवायला हवी, हे पवार यांच्या देहबोलीतून समस्त देशवासियांना नेहमीच दिसलेलं. साताऱ्यातून तुमच्या विरुद्ध कोणीच राष्ट्र्वादीकडून उभे राहण्यास तयार नसताना अडचणीच्या काळात पवारांच्या हाकेला श्रीनिवास पाटील धावले.

30 ते 35 वर्षाचा प्रशासकीय अनुभव, दोनदा खासदार, एकदा राज्यपाल अशी पदे भूषविलेले पाटील आरामात आपले जीवन जगू शकले असते पण पवारांच्या मैत्रीच्या हाकेला जागले. 60 वर्षाच्या मैत्रीत उन, वारा, पाऊस संगच झेलत राहिलेल्या पवार, पाटील यांच्या मैत्रीला वरुनराजाने ही सलामी दिली. पवारांचे आवेशपूर्ण शब्द थेट जनतेच्या काळजाला भिडले. दोन्ही मित्रानी एकमेकांना सावरलं आणि राजे तुमच्या मैत्रीपेक्षा 80 वर्षाच्या तरुणांची मैत्री सरस ठरली.

आज धनतेरस, त्यामुळेच मित्रत्वच खरं धन मानून अडचणीत धावून येणारा श्रीनिवास पाटील यांच्या सारखा एक तरी मित्र आपल्या सर्वाच्या आयुष्यात असायला हवा असे वाटते, मैत्री, प्रेम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्याचे काम पवार, पाटील जोडगोळीने केले, म्हणून ही दोस्ती अशीच पुढे ही कायम राहो अधिक दृढ होवो अशा शुभेच्छा!



दिगंबर मराठे


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...