Skip to main content

Covid-19: जगभरात कोरोनामुळे दिड लाखावर मृत्यू

अँकर वृत्तसेवा। कोरोना महामारीने जगाला आपल्या विळख्यात घेतले असून जगभर कोरोनाने 22 लाख 41 हजार 359 लोक आतापर्यंत बाधीत झाले आहे.तसेच जगातील मृतांचा आकडा (1,52,551)  दिड लाखाच्या वर पोहचला आहे. 24 तासात  नव्याने 81 हजार 153 लोक बाधीत झाले आहे. तर अमेरिका 2043, यूके 888 आणि स्पेनमधील 565 लोकांना नव्याने जीव गमवावा लागला आहे. जगात सर्वाधिक अमेरिकेत जवळपास 7 लाख लोक बाधीत आहे.

Covid-19-corona-virus

Photo: file

युरोप आणि अमेरिका खंडात सर्वाधिक बाधीत लोक आहेत. युरोपात 11,22,189 लोक बाधीत आहेत,24 तासात 35300 लोक नव्याने बाधीत झाले आहे तर आतापर्यंत ऐकूण मृत्यूचे प्रमाण 1,00,938 वर पोहचले असून युरोपात नव्याने 3737 लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपात स्पेन मध्ये 191726 इतके सर्वाधिक बाधीत असून 20043 लोकांना आतापर्यत जीव गमवावा लागला आहे त्यात स्पेनमध्ये 24 तासात 565 लोकांचा मृत्यू झालाय.इटलीत ऐकूण 175925 लोक बाधीत असून आतापर्यंत 23227 लोकांनी जीव गमवला आहे, नव्याने 480 लोकांचा मृत्यू झालाय. जर्मनीत 4294 तर यूकेत 15464 लोकांनी आतापर्यंत जीव गमवला असून युकेत नव्याने 888 लोकांचा मृत्यू झाला. 24 तासात अमेरिकेनंतर ही सर्वात मोठी आकडेवारी आहे.अमेरिकेत नव्याने 24 तासात 2043 लोकांनी जीव गमवला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 6,95,353 लोक बाधीत आहेत. आतापर्यंत 32427 लोकांनी जीव गमवला आहे. त्यानंतर ब्राझिल 33682 लोक बाधीत तर 2141 लोक मृत्यू पावलेत. कनाडात 32 हजार बाधीत झाले असून 1346 लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रशांत क्षेत्रात येणाऱ्या चीनमध्ये 84201 बाधीत लोक आहेत, त्यात नव्याने केवळ 21 जणांची भर पडली आहे, तर आतापर्यंत 4642 लोकांनी जीव गमवला आहे. नव्याने  मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. त्यामुळे चीनने या महामारीला नियंत्रित केले आहे. दक्षिण कोरिया, जापान, ऑस्ट्रेलिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, मलेशिया यांनी देखील कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचे दिसते. पूर्वमध्य क्षेत्रात इराण मध्ये 80 हजार लोक बाधीत झाले, तर आतापर्यंत 5031 लोकांचा जीव गेला आहे. दिलासादायक म्हणजे नवीन फक्त 73 रुग्ण आढळून आले. सऊदी अरब, पाकिस्तान, यूएई, कतार येथे ही मृत्यूचे प्रमाण कमी दिसते.

दक्षिणपूर्व आशियात 27319 लोक बाधीत आहेत. तर 1185 लोकांनी आतापर्यंत जीव गमविला आहे. भारतात 15712 लोक बाधीत आहेत, नवीन 1334 पॉझिटीव्ह आढळले आहे, 507 लोकांना जीव गमवावा लागला आहे. इंडोनिशियात 6248 बाधीत तर 535 लोकांचा मृत्यू झाला आहे. थायलंड आणि बांग्लादेशात 2 हजारावर रुग्ण बाधीत आहेत. मृतांचा आकडा शंभराच्या आत आहे. आश्चर्य म्हणजे बुद्धिष्ठ लोकसंख्या असलेल्या देशात मृत्यूचे प्रमाण शून्य आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...