Skip to main content

महिला कामगारांनी आरोग्याची काळजी घ्यावी: प्रेरणा बलकवडे

भगूर/प्रतिनिधी: कोरोना महामारी विरूद्ध लढत असतांना महिला कामगारांनी आपल्या आरोग्याची निगा ठेवणे महत्वाचे आहे. तसेच मासिक पाळी हा खासगी विषय न मानता तो महिला भगिनींचा निसर्गदत्त अधिकार असून त्यावर उघडपणे चर्चा होणे काळाची गरज आहे असे  मत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी आज येथे व्यक्त केले. जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त महिला कामगारांना त्यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे वाटप झाले त्याप्रसंगी त्याबोलत होत्या.
Covid-19-corona-virus
नागरीकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महिला स्वच्छता कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यांच्या कार्याला सलाम करत कोरोना विरूद्धचा लढा अधिक सक्षमतेने देता यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मविश्वास असाच अबाधित राहो यासाठी आपले ही काही दायित्व आहे.  त्यासाठी जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य साधून महिला कामगारांच्या आरोग्याचा विचार करुन  
झेप फाऊंडेशनच्या वतीने सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सेफऐव्हर कंपनीचे संचालक उपस्थित होते, 
Covid-19-corona-virus
यावेळी मार्गदर्शन करताना, बलकवडे म्हणाल्या की, महिला कोरोना योद्ध्यानी काम करत असतांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. मासिक पाळी हा वैयक्तिक किंवा खाजगी विषय मानू नये, अशा महत्त्वाच्या विषयावर उघडपणे आपले मत मांडायला हवे. तो महिलांचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यामुळे न लाजता निसंकोच पणे बोलायला हवे असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी सेफऐव्हर कंपनीचे संचालक नितीन उगले यांनी मासिक पाळीत महिलांनी ५ दिवस विशेष काळजी घ्यावी असे सांगितले, त्यासाठी योग्य सॅनिटरी पॅडचा वापर करावा तसेच या काळात पुरुषांनी त्यांना मानसिक आधार द्यायला हवा सध्याच्या विज्ञान युगातील काळात जुन्या रूढींना महत्व देऊ नये असे आवाहन ही त्यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते गोरखनाथ बलकवडे, प्रा सचिन उगले आदि उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...