Skip to main content

प्रेसनोट हातात पडली अन् त्यात माझ्याशीच साम्य असलेल्या व्यक्तीचे वर्णन वाचले..!

औरंगाबाद- मनपाच्या ताप केंद्रातील अनास्था, सह रुग्णांचे हाल, मिनी घाटीत कर्मचाऱ्यांनी घेतलेली काळजी व काही राजकीय पुढाऱ्यांनी दाखविलेला बालीशपणा असे संमिश्र अनुभव घेतले. घाबरुन जाऊ नका, धैर्यानेच कोरोनाला हरविणे सहज शक्य आहे, कोरोनाचा पराभव करुन सुखरुप घरी परतलेले पत्रकार तुषार वखरे सांगत होते.
Covid-19-corona-virus
फोटो: फाईल
ते म्हणाले, आरोग्य विषयक वार्तांकन करीत असल्याने शहरात पहिला रुग्ण आढळला, तेव्हापासून दररोज घाटी व मिनीघाटी रुग्णालयात जात होतो. मागील महिन्यात आईला काही लक्षणे जाणवू लागली. फॅमिली डॉक्टरांकडे उपचार घेऊन फरक पडला नाही. मलाही शंका होती, पण पत्रकारितेतील जबाबदारीही होती. वडील आईसोबत महापालिकेच्या सिडको कम्युनिटी सेंटरमध्ये गेले. तिथला अनुभव खूपच वाईट होता, असे वडिलांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमागील मनपा शाळेतील केंद्रात गेलो. त्यांनी शंका व्यक्त केली. लगेच मी स्वब दिले. दुसऱ्या दिवशी प्रेसनोटमध्ये माझ्याच परिसरात, माझ्याच वयाचा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे दिसले. नावे नसल्याने फोन करुन खात्री केली. तो मीच असल्याचे कळले. आईचाही अहवाल पॉझिटिव्ह होता. लगेच मिनी घाटीत ऍडमिट झालो.

परिचारिका, सफाई कामगार, जेवण देणारे कर्मचारी यांचा खूप चांगला अनुभव आला. डॉक्टर दोन-तीन दिवसांतून एकदा येत. मी पत्रकार असल्याचे कळल्याने आमची अधिक काळजी घेण्यात आली. इतर रुग्ण त्यांच्या व्यथा सांगत होते. मधुमेह असलेल्यांना भात देणे, दुर्लक्ष असे प्रकार व्यथित करीत होते. एकाने तिथल्या दुरावस्थेचा व्हिडिओ दाखवला. मी रुग्णालयातूनच तो व्हायरल केला. मग रुग्णांची अधिक काळजी घेतली जाऊ लागली.

मी पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यावर परिसरातील काही राजकीय नेत्यांनी दिलासा, धीर देण्याऐवजी अफवा पसरवून नागरिकांत संभ्रम व भीती पसरवली. रुग्णालयात मला विचारणा झाली. मी माझ्या संपर्कात आलेल्यांची नावे सांगितली. त्यांचा शोध सुरू झाला. त्यातील अनेकांनी मलाच उलट विचारले, की आमची नावे का सांगितली? मी काही मित्रांना बोलून तपासणी करण्याचे सुचवले. त्यात तीन पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कातील काही, असे अनेक रुग्ण समोर आले. आमच्या भागातील आकडा वाढला. वेळीच तपासणी झाल्याने त्यातील बहुतेक जण बरे झाले. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी भान ठेवून वागावे, एवढीच अपेक्षा आहे. तुषार यांची ही भावना औरंगाबादकर, प्रशासन व राजकीय नेत्यांनी धडा घ्यावा, अशीच आहे.

तुषार वखरे, पत्रकार औरंगाबाद

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...