Skip to main content

कोरोनाचा धोका अद्याप कायम; तातडीच्या उपायांवर भर: ना भुजबळ

नाशिक:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करत त्यावर आपण मात केली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचा धोका कायम असून या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत तातडीने उपाययोजना केल्या जातील असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
Covid-19-corona-virus
फोटो क्रेडिट:विकास भुजबळ
ना. छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालय येथे कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक घेत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभेचे उपसभापती ना.नरहरी झिरवळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीपकाका बनकर, आमदार नितीन पवार, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ,देविदास पिंगळे,माजी आमदार दीपिका चव्हाण,जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,विजय पाटील, संदिप पवार, यशवंत शिरसाठ आदी उपस्थित होते.

यावेळी ना. छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे आमदार तसेच जिल्ह्यातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यासोबत प्रत्येक मतदारसंघात असणाऱ्या अडचणी ना. छगन भुजबळ यांनी यावेळी समजून घेतल्या. यावेळी ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा,रुग्णवाहिका, कोविड केअर सेंटर, आणि डिसीएचसी मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदारांनी केली.खरीप हंगामासाठी शेतकरी पीक कर्ज वाटप, औद्योगिक वसाहत मधील अडचणी, कामगार, ग्रामीण भागातील लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेऊन हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील असा विश्वास ना.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...