Skip to main content

कोरोनाचा धोका अद्याप कायम; तातडीच्या उपायांवर भर: ना भुजबळ

नाशिक:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करत त्यावर आपण मात केली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचा धोका कायम असून या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत तातडीने उपाययोजना केल्या जातील असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
Covid-19-corona-virus
फोटो क्रेडिट:विकास भुजबळ
ना. छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालय येथे कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक घेत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभेचे उपसभापती ना.नरहरी झिरवळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीपकाका बनकर, आमदार नितीन पवार, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ,देविदास पिंगळे,माजी आमदार दीपिका चव्हाण,जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,विजय पाटील, संदिप पवार, यशवंत शिरसाठ आदी उपस्थित होते.

यावेळी ना. छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे आमदार तसेच जिल्ह्यातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यासोबत प्रत्येक मतदारसंघात असणाऱ्या अडचणी ना. छगन भुजबळ यांनी यावेळी समजून घेतल्या. यावेळी ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा,रुग्णवाहिका, कोविड केअर सेंटर, आणि डिसीएचसी मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदारांनी केली.खरीप हंगामासाठी शेतकरी पीक कर्ज वाटप, औद्योगिक वसाहत मधील अडचणी, कामगार, ग्रामीण भागातील लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेऊन हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील असा विश्वास ना.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...