Skip to main content

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनलॉक ३ मार्गदर्शक तत्वे जारी; शाळा, महाविद्यालयं ३१ ऑगस्टपर्यंत बंदच!.. वाचा काय सुरू होणार..

दिल्ली| केंद्रीय गृह मंत्रालयाने आज अनलॉक ३  ची नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली, त्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे,  येत्या 1 ऑगस्ट 2020 पासून अनलॉक ३ अमलात येणार असून टप्याटप्याने व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेची व्याप्ती अधिक व्यापक करण्यात आली आहे.
Unlock-३
फोटो: फाईल
राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडून आलेला प्रतिसाद आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी व्यापक चर्चा केल्यानंतर त्यावर ही नवी मार्गदर्शक तत्वे आधारित आहेत.

नवीन  मार्गदर्शक तत्त्वांची ठळक वैशिष्ठ्ये:-
  • व्यक्तींच्या रात्रीच्या ये- जा करण्यावरचा निर्बंध (नाईट कर्फ्यु) रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली.
  • योग संस्था आणि जिम्नॅशियम 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यासाठी परवानगी. या संदर्भातशारीरिक अंतर राखण्यासाठी आणि कोविड -19 चा संसर्ग रोखण्यासाठी,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मानक संचालन पद्धती जारी करेल.
  • स्वातंत्र्य दिन कार्यक्रमांना शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर यासह इतर आरोग्य नियमांचे पालन करत परवानगी.या संदर्भात गृह मंत्रालयाने 21-7- 2020 रोजी जारी केलेल्या सूचनांचे पालन आवश्यक.
  • राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतरशाळामहाविद्यालये आणि शिकवणी देणाऱ्या कोचिंग संस्था 31 ऑगस्ट 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • प्रवाश्यांसाठी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाला वंदे भारत अभियानांतर्गत मर्यादित पद्धतीने परवानगी देण्यात आली आहे.
  • प्रतिबंधित क्षेत्राबाहेरखालील बाबी वगळता सर्व बाबींना परवानगी देण्यात आली आहे-
i.  मेट्रो रेल्वे
ii.  सिनेमा हॉलतरण तलावमनोरंजन पार्कथिएटरबारऑडिटोरियाम, सभागृह आणि तत्सम स्थळे
iii.  सामाजिकराजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिकसांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आणणारे कार्यक्रम
परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार या बाबी खुल्या होण्यासाठीच्या तारखा स्वतंत्रपणे ठरवण्यात येतील.
  • प्रतिबंधित क्षेत्रात 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी जारी राहील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊनकोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिबंधित क्षेत्राचे काळजीपूर्वक सीमांकन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात कडक परिघिय नियंत्रण राखणे आवश्यक असून केवळ आवश्यक बाबीनाच परवानगी राहील.
  • ही प्रतिबंधित क्षेत्रे संबंधित जिल्हाधिकारी आणि राज्येकेंद्रशासित प्रदेश यांच्या संकेतस्थळावर अधिसूचित केली जातील आणि ही माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालायलाही दिली जाईल.
  • प्रतिबंधित क्षेत्रातल्या व्यवहारांवर राज्ये आणि केंद्र शासित औथोरिटी कडून काटेकोर देखरेख ठेवली जाईल. प्रतिबंधात्मक उपायांशी संबंधित मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी केली जाईल.
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्या बाबींसाठी राज्ये निर्णय घेणार
राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश परिस्थितीच्या मूल्यांकनानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर काही बाबींचा प्रतिबंध करू शकतातकिंवा आवश्यक काही निर्बंध घालू शकतात. मात्र आंतर राज्य आणि राज्या अंतर्गत व्यक्ती आणि मालाची आवक जावक याना निर्बंध नाही. अशी ये-जा करण्यासाठी वेगळ्या परवानगीचीसंमतीची,ई परवानगीची आवश्यकता नाही.

कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देश
शारीरिक अंतराची खातरजमा करून कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशांचे पालन देशभरात सुरूच ठेवायचे आहे. दुकानांनीग्राहकांमध्ये पुरेसे शारीरिक अंतर राखण्याची आवश्यकता आहे. गृह मंत्रालय राष्ट्रीय निर्देशाच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल.

असुरक्षित व्यक्तींचे संरक्षण
असुरक्षित व्यक्तीं उदा. 65 वर्षावरील व्यक्तीइतर  आजार असलेल्या व्यक्ती,गरोदर महिला,10 वर्षाखालील मुलेयांना अत्यावश्यक गरजा आणि आरोग्य विषयक बाबी वगळता घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्य सेतूचा वापर
आरोग्य सेतू मोबाईल ऐपच्या वापराला प्रोत्साहन सुरूच राहील असे सांगण्यात आले.
सौ. पीआयबी.


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...