Skip to main content

नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त खाटा आणि ऑक्सीजनची व्यवस्था व्हावी: संसदेत शून्य प्रहरात खा. डॉ. भारती पवार यांची महत्वपूर्ण मागणी

नाशिक| कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त रुग्ण खाटा व ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची खा.डॉ.भारती पवार यांनी केली संसदेत मागणी
Additional-beds-and-oxygen-should-be-provided-in-Nashik-Civil-Hospital-Eat-in-zero-hours-in-Parliament-Important-demand-of-Dr-mp-pawar

नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जलद गतीने वाढत असल्याने दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात शून्य प्रहरात प्रश्न मांडत खा.डॉ.भारती पवार यांनी अध्यक्षांच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे लक्ष वेधले.  नाशिक येथील जिल्हा सामान्य रूग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर व बेडच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असल्याने अनेक रुग्णांना आरोग्य सुविधे अभावी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. तर बऱ्याच रुग्णांना वेळेवर उपचारांसाठी खाटांची उपलब्धता होत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे तर अनेकांना उपचारा अभावी जिव गमवावे लागले आहे. 

केंद्र सरकरमार्फत लवकरात लवकर मध्यवर्ती पथकाकडून (केंद्रीय पथक) नाशिक जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांचा योग्य तो आढावा घेण्याची मागणी खासदार डॉक्टर भारती पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात जास्तीत जास्त बेडची लवकरात लवकर व्यवस्था करावी व रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा दिली जाऊ शकते या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. खा.डॉ.भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील वाढती परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी स्वतः भेट घेऊन सदर प्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली व लवकरात लवकर मदत व्हावी अशी विनंती केली आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...