Skip to main content

भगूर पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द: प्रेरणा बलकवडे

नाशिक|नाशिक जिल्ह्यातील झेप फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्य मार्फत पुणे येथील जगदंबा ऑटो कोम्पोनंटस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नाशिक जिल्ह्यातील २५ युवकांस रोजगार उपलब्ध झाला आहे. भगूर पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि झेप भरारी फाउंडेशनच्या सौ.प्रेरणा बलकवडे यांनी केले. 
Committed-to-provide-employment-to-the-youth-of-Bhagur-Panchkrushi-Prerna-Balkwade

झेप भरारी फाउंडेशन समाजातील सर्वच घटकांसाठी काम करत आहे, कोरोना महामारीमुळे आज अनेक युवक बेरोजगारीच्या विळख्यात सापडले आहे.  शिक्षित तरुणांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा राहिलेला असून अशा कठीण कालावधीत रोजगार मेळावे घेऊन युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेला राष्ट्रवादी महिला
 काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व झेप फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.प्रेरणा बलकवडे यांनी मुहूर्तरूप दिले, त्यासाठी वर्चुअल रोजगार मेळावा भरवून त्यांनी पहिल्या टप्प्यात युवकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित नोकरी अश्याप्रकारे  २५ मुलांसाठी नोकरीची व्यवस्था करून दिली. त्यासोबतच त्याच तरुणांची तिथे राहण्याची व जेवण्याचे व्यवस्थेचे आयोजन देखील पूर्णपणे झेप फाउंडेशनने करून दिले.

शैक्षणिक गुणवत्तेनुसार नोकरी

झेप फाउंडेशन हे समाजसेवेसाठी उभी राहिलेली संस्था असून  अश्याच प्रकारे मेळावे घेऊन युवकांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते नुसार नोकरीची संधी उपलब्ध करून देणेसाठी आम्ही कटिबद्ध असून, सध्याच्या टप्प्यात भगूर व पंचक्रोशीतील युवकांस रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून रोजगार मेळाव्याचा पुढचा टप्पा हा येत्या २० सप्टेबर रोजी होणार असून जास्तीत जास्त युवकांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. प्रेरणा बलकवडे यांनी केले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...