Skip to main content

आपण माणूस म्हणून कसे आहोत याला ही महत्व असते:उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी

नाशिक|आपण व्यापारी, कारखानदार, व्यावसायीक नंतर आहोत. आधी माणूस आहोत. माणूस म्हणून कसे आहोत हे विशेष महत्वाचे असते असे प्रतिपादन उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यानी केले.
  
This-is-how-we-are-as-human-beings-Upadhyay-pp-Praveen-Rishiji

ते पुढे म्हणाले की, श्रेष्ठ लोकांसोबत जा श्रेष्ठ व्हा आणि इतरांना श्रेष्ठ बनवा, यशस्वी लोकांनाच आठवावे, कोणाकडून प्रशिक्षण घ्यावे, योग्य गुरु निवडावा जो तुमच्या चुका माफ करणार नाही सुधारून घेईल, व्हिजन क्लिअर असावे, सहयोग देणे आणि घेण्यामुळे व्यक्ती समर्थ बनतो. या पाच सूत्रामुळे व्यक्ती यशस्वी होतो आणि यशस्वी माणूस यशस्वी उद्योजक निश्चित होतो. सहयोग घेण्याची कला मधमाशीकडून शिका स्वतः श्रेष्ठ बना इतरांना श्रेष्ठ बनवा. रस्त्यावर चालणारे बनू नका रस्ता निर्माण करणारे बना असे सांगून उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांनी शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांची उदाहरणाद्वारे दिले.    

सुरवातीला मंत्राचा पाठ केला.  महाराष्ट्र चेंबरतर्फे आयोजित यशस्वी व्यक्ती किंवा यशस्वी व्यावसायिक होऊ इच्छिता ? याविषयावर मार्गदर्शन करतांना यशस्वी होण्याचे ५ सूत्र गुरुजींनी सांगितले.   
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचा ९३ वा  स्थापना दिनानिमित्त एम. एल. डहाणूकर व्याख्यानमालेतील ६ वे व्याख्यान शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३.४५ वाजता उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांचे आपण एक यशस्वी व्यक्ती किंवा यशस्वी व्यावसायिक होऊ इच्छिता ? याविषयावर झूम ऍपवर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा उपस्थित होते. 

सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाराष्ट्र चेंबरच्या ९३ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र चेंबरचे संस्थापकएम. एन. डहाणूकर  त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. शेठ वालचंद यांनी महाराष्ट्र चेंबरची स्थापना केली. त्यांच्या स्मरणार्थ वालचंद व्याख्यानमाला सुरु केली तसेच संस्थापकएम. एल. डहाणूकर  यांच्यास्मरणार्थ यांच्या डहाणूकर व्याख्यानमाला सुरु केली.  उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांचे आज ६ वे व्याख्यानआयोजित केल्याचे सांगितले. आजचा विषय खूप  महत्वाचा आहे. आपण व्यापारी, कारखानदार, व्यावसायीक नंतर आहोत. आधी माणूस आहोत. माणूस म्हणून कसे आहोत हे विशेष महत्वाचे असते. कोरोना काळात आपण जगत आहोत. अनेक विपरीत अनुभव माणसांचे आले आहेत. डाॅक्टरांना मारहाण करणारे रुग्ण, पिळवणूक करणारी मंडळी, सर्वस्व विसरून लढणारे कोरोना योद्धे, वगैरे वगैरे. यात माणूस दिसला की आपण नतमस्तक होतो. चांगला माणूस हा खरा परिचय असतो.  "परी अंतरी सज्जना निववावे " असे रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक यात सांगितले आहे. प्रत्येक माणसाच्या अंतरी म्हणजे मनात एक सज्जन रहात असतो व त्याचे सदैव समाधान करावे असे ते सांगतात. म्हणजेच चांगला माणूस व्हा हेच सांगत आहेत. 

सध्याच्या महामारीविरूध्द लढण्याच्या कसोटीच्या काळात हा विषय मला आधिक महत्वपूर्ण  वाटतो. त्यावर आपल्या सखोल अभ्यास, चिंतन आणि पावित्र्य यासह मार्गदर्शन करण्यासाठी मुनिश्री यांस निमंत्रित केले आहे. त्यांचे विचार, मार्गदर्शन व उपदेश आपल्याला नवी दृष्टी देईल असा विश्वास वाटतो असे मंडलेचा म्हणाले. श्री. अशोक पगारिया यांनी उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.  ललित गांधी यांनी मानले. उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, सौ. शुभांगी तिरोडकर, संदेश राऊळ, सौ. सोनल दगडे,समीर दुधगांवकर, प्रमोद शहा,  यांच्यासह अनेकांनी प्रश्न विचारले व गुरुजींनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली.   यावेळी मनिष पाटील यांनी उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांची कार्यशाळेला उपस्थित होते त्यापासून त्यांना झालेला फायदा थोडक्यात सांगितले. मनीष पाटील (पुणे) स्वतःची स्वतःला कशी ओळख करून द्यायची मनशांती कशी लाभली हे सांगितले. 

महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, अनिलकुमार लोढा, गौतम ठाकूर, उमेश दाशरथी, सौ. शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, नाशिक शाखा चेअरमन संजय दादलिका, सचिन शहा, सरकार्यवाह सागर नागरे, सचिव चंद्रकांत दीक्षित, विनी दत्ता, चेंबरचे कार्यकारिणी सदस्य, सभासद,  व्यापारी, उद्योजक कार्यक्रमास मोठ्या संख्येने ऑनलाईन झूम ऍपवर उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...