Skip to main content

आपण माणूस म्हणून कसे आहोत याला ही महत्व असते:उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी

नाशिक|आपण व्यापारी, कारखानदार, व्यावसायीक नंतर आहोत. आधी माणूस आहोत. माणूस म्हणून कसे आहोत हे विशेष महत्वाचे असते असे प्रतिपादन उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यानी केले.
  
This-is-how-we-are-as-human-beings-Upadhyay-pp-Praveen-Rishiji

ते पुढे म्हणाले की, श्रेष्ठ लोकांसोबत जा श्रेष्ठ व्हा आणि इतरांना श्रेष्ठ बनवा, यशस्वी लोकांनाच आठवावे, कोणाकडून प्रशिक्षण घ्यावे, योग्य गुरु निवडावा जो तुमच्या चुका माफ करणार नाही सुधारून घेईल, व्हिजन क्लिअर असावे, सहयोग देणे आणि घेण्यामुळे व्यक्ती समर्थ बनतो. या पाच सूत्रामुळे व्यक्ती यशस्वी होतो आणि यशस्वी माणूस यशस्वी उद्योजक निश्चित होतो. सहयोग घेण्याची कला मधमाशीकडून शिका स्वतः श्रेष्ठ बना इतरांना श्रेष्ठ बनवा. रस्त्यावर चालणारे बनू नका रस्ता निर्माण करणारे बना असे सांगून उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांनी शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांची उदाहरणाद्वारे दिले.    

सुरवातीला मंत्राचा पाठ केला.  महाराष्ट्र चेंबरतर्फे आयोजित यशस्वी व्यक्ती किंवा यशस्वी व्यावसायिक होऊ इच्छिता ? याविषयावर मार्गदर्शन करतांना यशस्वी होण्याचे ५ सूत्र गुरुजींनी सांगितले.   
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचा ९३ वा  स्थापना दिनानिमित्त एम. एल. डहाणूकर व्याख्यानमालेतील ६ वे व्याख्यान शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३.४५ वाजता उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांचे आपण एक यशस्वी व्यक्ती किंवा यशस्वी व्यावसायिक होऊ इच्छिता ? याविषयावर झूम ऍपवर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा उपस्थित होते. 

सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाराष्ट्र चेंबरच्या ९३ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र चेंबरचे संस्थापकएम. एन. डहाणूकर  त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. शेठ वालचंद यांनी महाराष्ट्र चेंबरची स्थापना केली. त्यांच्या स्मरणार्थ वालचंद व्याख्यानमाला सुरु केली तसेच संस्थापकएम. एल. डहाणूकर  यांच्यास्मरणार्थ यांच्या डहाणूकर व्याख्यानमाला सुरु केली.  उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांचे आज ६ वे व्याख्यानआयोजित केल्याचे सांगितले. आजचा विषय खूप  महत्वाचा आहे. आपण व्यापारी, कारखानदार, व्यावसायीक नंतर आहोत. आधी माणूस आहोत. माणूस म्हणून कसे आहोत हे विशेष महत्वाचे असते. कोरोना काळात आपण जगत आहोत. अनेक विपरीत अनुभव माणसांचे आले आहेत. डाॅक्टरांना मारहाण करणारे रुग्ण, पिळवणूक करणारी मंडळी, सर्वस्व विसरून लढणारे कोरोना योद्धे, वगैरे वगैरे. यात माणूस दिसला की आपण नतमस्तक होतो. चांगला माणूस हा खरा परिचय असतो.  "परी अंतरी सज्जना निववावे " असे रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक यात सांगितले आहे. प्रत्येक माणसाच्या अंतरी म्हणजे मनात एक सज्जन रहात असतो व त्याचे सदैव समाधान करावे असे ते सांगतात. म्हणजेच चांगला माणूस व्हा हेच सांगत आहेत. 

सध्याच्या महामारीविरूध्द लढण्याच्या कसोटीच्या काळात हा विषय मला आधिक महत्वपूर्ण  वाटतो. त्यावर आपल्या सखोल अभ्यास, चिंतन आणि पावित्र्य यासह मार्गदर्शन करण्यासाठी मुनिश्री यांस निमंत्रित केले आहे. त्यांचे विचार, मार्गदर्शन व उपदेश आपल्याला नवी दृष्टी देईल असा विश्वास वाटतो असे मंडलेचा म्हणाले. श्री. अशोक पगारिया यांनी उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.  ललित गांधी यांनी मानले. उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, सौ. शुभांगी तिरोडकर, संदेश राऊळ, सौ. सोनल दगडे,समीर दुधगांवकर, प्रमोद शहा,  यांच्यासह अनेकांनी प्रश्न विचारले व गुरुजींनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली.   यावेळी मनिष पाटील यांनी उपाध्याय पी. पी. प्रवीणऋषीजी ( एम. एस) यांची कार्यशाळेला उपस्थित होते त्यापासून त्यांना झालेला फायदा थोडक्यात सांगितले. मनीष पाटील (पुणे) स्वतःची स्वतःला कशी ओळख करून द्यायची मनशांती कशी लाभली हे सांगितले. 

महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, अनिलकुमार लोढा, गौतम ठाकूर, उमेश दाशरथी, सौ. शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, नाशिक शाखा चेअरमन संजय दादलिका, सचिन शहा, सरकार्यवाह सागर नागरे, सचिव चंद्रकांत दीक्षित, विनी दत्ता, चेंबरचे कार्यकारिणी सदस्य, सभासद,  व्यापारी, उद्योजक कार्यक्रमास मोठ्या संख्येने ऑनलाईन झूम ऍपवर उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...