Skip to main content

तुम्ही प्रयत्न करा, नोकरी आम्ही मिळून देऊ: प्रेरणा बलकवडे यांचे आवाहन! मेळाव्याला ६०० युवक युवतींचा प्रतिसाद

नाशिक| वेळ कठीण आहे पण युवक-युवतींनी गोंधळून न जाता नोकरीसाठी सतत प्रयत्नशील रहावे आम्ही ही तुम्हाला नोकरी मिळून देण्यास कटिबध्द आहोत असे आवाहन  राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि झेप भरारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी आज येथे केले आहे. 
You-try-we-will-get-the-job-together-Prerna-Balkwades-appeal-Response-of-600-young-men-and-women-to-the-meet

नोकरी मेळाव्याप्रसंगी बेरोजगार युवक युवतींना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.भगूर शहरात युवक युवतींसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि झेप फाऊंडेशनच्या वतीने(Job Fair2020) नोकरी मेळाव्याचे करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सुमारे ६०० हून अधीक युवक युवतींनी सहभाग नोंदवला. 

करोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे इतर राज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे उद्योगीक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या पार्श्वभुमीवर पुणे,मुंबई, नाशिक, नागपूर येथील नामांकीत अस्थापना कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या रिक्तपदांसाठी मोठी संधी देऊ केली आहे. 

तरुणांसाठी आज घडीला नोकरी मिळवणे हे खुप कठीण काम वाटते. ‌ योग्य माहितीची कमतरता, अधिक माहिती, नेमका इंटरेस्ट कशात याविषयी माहिती नसणे, करिअरविषयीचे अनेक समज-गैरसमज आणि करिअरविषयी मनात असलेला गोंधळ नेमका का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नात ते गोंधळून जातात..पण या सर्व गोष्टींना वाचा देत, तुम्ही प्रयत्न करा नोकरी आम्ही मिळवून देऊ असे आश्वासन राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष  प्रेरणा बलकवडे यांनी तरुणांना दिले तसेच या पुढेदेखील रोजगारासाठी काऊंसीलींग सेंटर भगूर मध्ये सुरु राहील अशी महिती त्यांनी बोलताना दिली. 

तत्व टेकनाॅलोजीस(ठाणे), आरयन हाॅस्पीटॅलिटी, पाटले एड्यू स्कील्स फाऊंडेशन( नागपूर), ॲक्युरा वाॅलव्ह, भंडारी ग्लोबल सरव्हीसेस, अजमेरा इंडस्ट्रीज, एमपी असोसीएट्स, स्वराली काॅन्ट्रेक्ट्स या कंपनींसह काही कंपन्यांचे virtual मुलाखाती देखील या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती झेप फाऊंडेशनचे सेक्रटरी विशाल बलकवडे यांनी दिली. आज जागेवर ४० लोकांची नेमणुक करण्यात आली असून पुढील दोन दिवसात नेमणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे व त्यात देखील असंख्य तरुणांना नोकरीची संधी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. आर्यन हॉस्पीटॅलिटीचे रसल मॅथीव व पाटले एड्यू स्कील्सचे रंजीत पांडे यांनी तरुणांना ऑडियो कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन केले. 

या वेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, विशाल बलकवडे, आमोल हरळे, गोरखनाथ बलकवडे, चिंतन अजमेरा, गणेश गायधनी, पंकज शेलार, सतीश भंडारी, दर्शन अनारे, सचीन गुळवे, सुरज वंदार, आदिंसह असंख्य युवक युवती उपस्थित होते.



Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...