Skip to main content

नुकसानग्रस्त शेतीपिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी: खा. पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांची मागणी

नाशिक| अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा, मका, सोयाबीन आदी पिकांचे प्रंचड नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केली.  
Compensation-should-be-given-through-agricultural panchnama-mp-Pawars-demand-for-district-leader-pagar
नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले खा.शरद पवार यांना वरील मागणीचे निवेदनही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे पेरलेले बियाणे खराब झाले आहेत, रोपे वाहून गेली, अती पावसामुळे बियाणे लागवडी नंतर उगवलेच नाहीत. दुबार पेरण्याही वाया गेल्या तर बियाणांचे भावही गगनाला भिडले असल्याने शेतकरी हतबल झाला असून याबाबत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतही खा.शरद पवार यांना साकडे घालण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार यांनी सांगितले.

कांदा उत्पादक जिल्हा असतांनाही केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना फक्त २५ टन (२५० क्विंटल) तर किरकोळ विक्रेत्यांना २ टन (२० क्विंटल) एवढाच माल साठवण्याचे निर्बंध घातल्याने चौकशी व कारवाईच्या भीतीपोटी गेल्या काही दिवसात व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्याने कांद्याचे भावही घसरले व खरेदी बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारशी बोलून किमान कांदा उत्पादक जिल्ह्यांमधील हि मर्यादा काढून टाकण्यात यावी असे साकडेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी माजी कृषिमंत्री खा.शरद पवार यांना घातले आहे.
मका पिकाला १८५० रुपये हमीभाव असतांनाही फक्त ९०० ते १००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे बाजार हस्तक्षेप योजना राबवून सरकारने मक्याला हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणीही खा. पवार यांच्याकडे यावेळी करण्यात आली.  
          
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, आ. दिलीप बनकर, आ. सरोज अहिरे, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंत जाधव, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगिरथ शिंदे, कोंडाजी आव्हाड, नाना महाले, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, जयदत्त होळकर, महेश भामरे, शिवदास डागा,  फिरोज मसानी, राजेंद्र डोखळे, राजेंद्र भामरे, विलास रौंदळ, हंसराज गोडबोले, अनिता भामरे  आदी उपस्थित होते.      
 
(फोटो: नुकत्याच झालेल्या पावसामुळे कांदा, मका, सोयाबीन आदी पिकांचे प्रंचड नुकसान झाल्याने शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांना देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार समवेत माजी खासदार समीर भुजबळ, आ.दिलीप बनकर, हेमंत टकले, कोंडाजी आव्हाड आदी दिसत आहेत.)

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...