Skip to main content

लासलगाव, पिंपळगाव समितीत कांद्याचे लिलाव बंद; लिलाव सुरू करण्याची शेतकरी संघर्ष संघटनेची मागणी

नाशिक| किरकोळ बाजारात कांद्याने ८० ते १०० रुपये किलो दर गाठला असून कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदीसह आता कांदा साठवणुकीवर ही मर्यादा लागू केली आहे. किरकोळ व्यापाऱ्याला २ टन तर घाऊक व्यापाऱ्यांना २५ टनाची मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवहारात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने व्यापाऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव बसवंत सह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवले होते.  
Lasalgaon-Pimpalgaon-Samiti-onion-auction-closed-Start-the-auction-Demand-of-shetkari-sanghrsh-sanghtna
फोटो:फाईल

लिलाव बंद असल्याने कांद्याची खरेदी बंद होती त्यामुळे शेतकऱ्यांचे ही अर्थिक नुकसान झाले. दरम्यान कांदा लिलाव सुरू करावे अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे. पावसामुळे मुख्य उत्पादक महाराष्ट्रातील कांद्याचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या कांदा उत्पादक राज्यांना अवकाळी आणि परतीच्या पावसाचा मोठा फटाका बसला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी  केंद्राने इराण आणि इजिप्तचा कांदा आयात केला आहे. त्यामुळे एकीकडे कांदा दर घसरण्याच्या शक्यतेची टांगती तलवार तर दुसरीकडे लिलाव बंद राहिल्यास कांदा सडण्याची भीती अशा दुहेरी कचाट्यात शेतकरी सापडला आहे.  

कांदा लिलाव सुरू करा: नाना बच्छाव
सर्व बाजारसमित्या तात्काळ सुरु करा आणि कांदा खरेदी करावा सरकारने कांद्याच्या संदर्भातील निर्णय त्वरित मागे घ्यावा शेतकऱ्यांना वेठीस धरु नका अन्यथा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय रहाणार नाही.
 
नाना बच्छाव, कार्याध्यक्ष.शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...