Skip to main content

उपनगर खून प्रकरणातील कुख्यात गुन्हेगारास अटक: गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कामगिरी

नाशिक|  उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या व इतर ०२ गुन्हयातील हवा असलेला आरोपी नाशिक शहरातील कुख्यात गुंड जॉन पडेची (वय २८) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ विभागाने ही कारवाई करुन त्याला जेरबंद केले आहे. 
Upnagar-khun-prakarnatil-kukhyat-gunhegaras-guhne-shakhechya-unit2-kadoon-atak
नाशिक शहरातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी आदेश दिले होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् , गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निषाणदार , सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर, पो.निरी . अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि . मंगळवारी दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी येथील नेमणुकीला असलेले सहापो. निरीक्षक शामराव भोसले यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीद्वारे सहा.पो.निरी. अभिजीत सोनवणे, सहा.पो.उपनिरी  शामराव भोसले, पोहवा यशवंत बेंडकुळे, राजेंद्र घुमरे, अन्सार सैय्यद, पो.शि. संतोष माळोदे आदीच्या पथकाने पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचला, 

येथिल पासपोर्ट ऑफिसच्यासमोर मधुबन चायनीज हॉटेल पिंगळे वस्ती येथून वरील गुन्हयात हवा असलेला कुख्यात आरोपी जॉन चलन पडेची (वय २८ वर्ष), रा.कॅथे कॉलनी, देवी मंदिराच्या मागे देवळाली कॅम्प, नाशिक यास सापळा रचुन चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्याची सखोल चौकशी केेली असता आरोपीने वरील नमुद गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास अटक करून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. 

पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने  नाशिकरोड आणि देवळाली येथिल विविध गुन्ह्यातील सहभागाची ही कबुली दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निषानदार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री मोहन ठाकुर. पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, सपोनि श्रीराम पवार, अभिजीत सोनवणे वसंत खतेले, पोउपनिरी विजय लोंढे , सहा.पो.उपनिरी शामराव भोसले , राजेंद्र जाधव , पोहवा राजेंद्र घुमरे, यशवंत बेंडकुळे, अन्सार सैय्यद , शंकर काळे , देवकिसन गायकर , रमेश घडवजे, पोना  संजय ताजणे, परमेश्वर दराडे , पो.शि. यादव डंबाळे , गौरव गवळी , संतोष माळोदे , जयंत शिंदे , बाळा नांद्रे महिला पो.शि. कोमल यादव आदींनी केली आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...