Skip to main content

उपनगर खून प्रकरणातील कुख्यात गुन्हेगारास अटक: गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कामगिरी

नाशिक|  उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या व इतर ०२ गुन्हयातील हवा असलेला आरोपी नाशिक शहरातील कुख्यात गुंड जॉन पडेची (वय २८) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ विभागाने ही कारवाई करुन त्याला जेरबंद केले आहे. 
Upnagar-khun-prakarnatil-kukhyat-gunhegaras-guhne-shakhechya-unit2-kadoon-atak
नाशिक शहरातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी आदेश दिले होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् , गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निषाणदार , सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर, पो.निरी . अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि . मंगळवारी दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी येथील नेमणुकीला असलेले सहापो. निरीक्षक शामराव भोसले यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीद्वारे सहा.पो.निरी. अभिजीत सोनवणे, सहा.पो.उपनिरी  शामराव भोसले, पोहवा यशवंत बेंडकुळे, राजेंद्र घुमरे, अन्सार सैय्यद, पो.शि. संतोष माळोदे आदीच्या पथकाने पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचला, 

येथिल पासपोर्ट ऑफिसच्यासमोर मधुबन चायनीज हॉटेल पिंगळे वस्ती येथून वरील गुन्हयात हवा असलेला कुख्यात आरोपी जॉन चलन पडेची (वय २८ वर्ष), रा.कॅथे कॉलनी, देवी मंदिराच्या मागे देवळाली कॅम्प, नाशिक यास सापळा रचुन चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्याची सखोल चौकशी केेली असता आरोपीने वरील नमुद गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास अटक करून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. 

पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने  नाशिकरोड आणि देवळाली येथिल विविध गुन्ह्यातील सहभागाची ही कबुली दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निषानदार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री मोहन ठाकुर. पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, सपोनि श्रीराम पवार, अभिजीत सोनवणे वसंत खतेले, पोउपनिरी विजय लोंढे , सहा.पो.उपनिरी शामराव भोसले , राजेंद्र जाधव , पोहवा राजेंद्र घुमरे, यशवंत बेंडकुळे, अन्सार सैय्यद , शंकर काळे , देवकिसन गायकर , रमेश घडवजे, पोना  संजय ताजणे, परमेश्वर दराडे , पो.शि. यादव डंबाळे , गौरव गवळी , संतोष माळोदे , जयंत शिंदे , बाळा नांद्रे महिला पो.शि. कोमल यादव आदींनी केली आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...