Skip to main content

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, नागरिकांनी सतर्क रहावे: ना. भुजबळ

नाशिक| कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सतर्क रहावे. तसेच शासकीय व खाजगी लॅबमधील स्वॅब तपासणी अहवालातील तुलनात्मक विश्लेषण करून कोरोना परिस्थितीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
Increasing-incidence-of-corona-citizens-should-be-aware-minister-Bhujbal
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हातील कोरोना उपाययोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे, अन्न, औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. उत्कर्ष दुधेडिया आदी उपस्थित होते.
सुरुवातीलाच मा पालकमंत्र्यांना माहिती देत असताना जिल्हाधिकारी  सुरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोविड टेस्टिंगचे प्रमाण वाढविले असल्याने बऱ्याच दिवसांनंतर पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी जिल्ह्याचा मृत्युदर कमी असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय व खाजगी लॅबमधील स्वॅब तपासणीच्या अहवालात सतत तफावत आढळून येत असून यावर पडताळणी करणे गरजेचे झाले आहे असेही सांगितले.  त्यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी एकाच वेळी घेण्यात आलेले स्वॅब शासकीय व खाजगी लॅबकडे तपासणीसाठी पाठविणे, खाजगी लॅबमध्ये 28 टक्के अधिक पॉझिटीव्ह अहवाल येत असल्याने त्यातील ठराविक स्वॅबची शासकीय लॅबमध्ये पुन्हा तपासणी करणे आणि दैनंदिन घेण्यात येणारे स्वॅब जिल्हा रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली मध्यवर्ती ठिकाणी एकत्र करून त्यानंतर विविध लॅब्समध्ये तपासणीसाठी पाठविण्यात यावे, असे तीन पर्याय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत सांगितले. यावर त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही, इतर शहरांमधील वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे बंधन येऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा नियमित वापर करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे खाजगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या स्वॅब तपासणीतील पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 28 टक्के तर शासकीय लॅबमधील पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 5 टक्के येत असल्याने याबाबत प्रशासनामार्फत पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.
 
त्याचप्रमाणे रूग्णांमधील हर्डइम्युनिटी तपासण्यासाठी शहरात करण्यात येणाऱ्या ‘सिरो सर्व्हे’चे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लस घेतली असून त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचे दिसून आल्याने देण्यात येणारी कोविशिल्ड ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे कोरोना काळात फ्रंटलाईनवर राहून काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेऊन लसीकरणाची मोहीम यशस्वी करावी. असे आवाहन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले आहे.

लसीकरण मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक :  सूरज मांढरे

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 36 हजार 720 उद्दीष्टापैकी 29 हजार 600 लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 29 केंद्र सुरू असून या केंद्रांवर आठवड्यातील पाच दिवस लसीकरण करण्यात येत आहे. 10 मार्च पर्यंत लसीकरणाचा पहिला टप्पा शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मालेगावं येथे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी तेथील धर्मगुरूं तथा मौलवी यांची मदत घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी आरोग्य यंत्रणेला सांगितले आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...