Skip to main content

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

नाशिक| विंचूर|  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे.
NCPs-district-president-Adv-ravindra-pagar-led-by-Road-block
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी अॅड. रविंद्र पगार बोलत होते. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, पुरुषोत्तम कडलग, राजेंद्र डोखळे, हरिश्चंद्र भवर, बबन शिंदे आदींची भाषणे झाले.

पेट्रोल, डिझेलची मोठया  प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला असून केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी घरगुती गॅसचे भाव वाढल्यावर टीव्हीवर येऊन गृहिणीचे बजेट कोलमडल्याचे ओरडून सांगणाऱ्या त्या काकू आता गॅसचे दर ७२५ रुपये इतके झाले तरी त्या अजून टिव्हीवर दिसत नाहीत. त्या काकू कुठे गेल्या ते शोधावे लागेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई मेहंगाई कि मार... अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव ९५ रुपये तर डिझेलचे भाव ८४ रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का असा सवाल देखील अॅड. पगार यांनी यावेळी बोलतांना केला. 

एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
 
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना  पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, भाऊसाहेब भवर, बबनराव शिंदे, निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, दिंडोरी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या नुतन आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे, योगेश पाटील, ना‌. छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, पांडुरंग राऊत, राहुल सालगुडे, प्रफुल पवार, भुषण शिंदे, राजेंद्र बारगुडे,  सचिन दरेकर, संतोष राजोळे, अनिल सोनवणे, ललित दरेकर, आत्माराम दरेकर, स्माईल मोमीन, मंगेश गवळी, अर्षद शेख, सोहेल मोमीन, महेश मेथे, शिवाजी सुपनार, दत्ता रायते, रंजीत गुंजाळ, दत्ता डुकरे, मोसिन शेख, जयंत साळी, विलास गोरे, अविनाश सालगुडे, सुनिल आहेर, दत्ता वाघचौरे, शाम हिरे, ललित निकम, किरण भोसले, मोसिन शेख, अविनाश सालगुडे, मधुकर गावडे, नानासाहेब जेऊघाले, रामकृष्ण दराडे, बाळासाहेब पुंड, अशोक नागरे, संतोष राजोळे, जयंत साळी. अनिल विंचूरकर, अशोक गोसावी, विलास गोरे, सचिन वाघ, महेंद्र पुंड, तौसिफ मनियार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
 
 

फोटो ओळी - पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार समवेत पुरुषोत्तम कडलग, जयदत्त होळकर, भाउसाहेब भवर, राजेंद्र डोखळे, साहेबराव मढवई, बबनराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, ज्ञानेश्वर शेवाळे, सोहेल मोमिव आदी दिसत आहेत.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...