Skip to main content

शेतकऱ्यांसह जनतेचा वीज पुरवठा खंडित करू नये: खा. डॉ. भारती पवार

नाशिक| शेतकऱ्यांचे शेतात रब्बी पिकांचे कामे सुरू आहे, अशातच वीज बिल भरले नाही तर कनेक्शन कट केले जाईल असा आदेश सरकारने काढला आहे. त्यामुळे कोरोना काळाच्या संकटातून शेतकरी हळुहळू सावरत असताना हा प्रकार शेतकऱ्यांना अडचणीत भर टाकणारा आहे. शेतकऱ्याला आता खरी मदतीची गरज असून शेतकऱ्यांसह जनतेचा ही वीज पुरवठा तोडू नये अशी मागणी खा. डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केली आहे. 
Power-supply-to-the-people-including-farmers-should-be-started-immediately-mp-Dr-Bharti-Pawar
शेतकऱ्यांचं सामान्य जनतेच्या गंभीर मुद्यावर खा. डॉ.भारती पवार यांनी संसदेत प्रश्न मांडले, कोरोनाचे संकट असेल किंवा निसर्गाचे संकट असेल शेतकरी मोठ्या धैर्याने हे संकट पेलत आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहे. खा. डॉ.भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्याचे उदाहरण देत आज गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा इतर रब्बी पिकांची काढणी चालू आहे. याकरता वेळेवर शेतीला पाणी देणे गरजेचे असताना महाराष्ट्र राज्य सरकारने एक शासन निर्णय (जी.आर.) असा काढला आहे की, जर विज बिल भरले नाही तर कनेक्शन कट करायचं. 

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज विजेची गरज आहे. त्यांना नोटीस दिली पाहिजे, सवलत दिली पाहिजे. परंतु चार शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाहीत तर शंभर शेतकऱ्यांची भरलेले वीजबिले न बघता तात्काळ गावातीलच डीपीवरून दिले गेलेले कनेक्शन बंद करण्यात येत आहे. याचा खा. डॉ. भारती पवार यांनी संसदेत निषेध करत केंद्र सरकारच्या माध्यमातून या गंभीर मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ लक्ष देवून आज सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित न करता तात्काळ सुरळीत करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात केली आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...