Skip to main content

शेतकऱ्यांसह जनतेचा वीज पुरवठा खंडित करू नये: खा. डॉ. भारती पवार

नाशिक| शेतकऱ्यांचे शेतात रब्बी पिकांचे कामे सुरू आहे, अशातच वीज बिल भरले नाही तर कनेक्शन कट केले जाईल असा आदेश सरकारने काढला आहे. त्यामुळे कोरोना काळाच्या संकटातून शेतकरी हळुहळू सावरत असताना हा प्रकार शेतकऱ्यांना अडचणीत भर टाकणारा आहे. शेतकऱ्याला आता खरी मदतीची गरज असून शेतकऱ्यांसह जनतेचा ही वीज पुरवठा तोडू नये अशी मागणी खा. डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केली आहे. 
Power-supply-to-the-people-including-farmers-should-be-started-immediately-mp-Dr-Bharti-Pawar
शेतकऱ्यांचं सामान्य जनतेच्या गंभीर मुद्यावर खा. डॉ.भारती पवार यांनी संसदेत प्रश्न मांडले, कोरोनाचे संकट असेल किंवा निसर्गाचे संकट असेल शेतकरी मोठ्या धैर्याने हे संकट पेलत आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहे. खा. डॉ.भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्याचे उदाहरण देत आज गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा इतर रब्बी पिकांची काढणी चालू आहे. याकरता वेळेवर शेतीला पाणी देणे गरजेचे असताना महाराष्ट्र राज्य सरकारने एक शासन निर्णय (जी.आर.) असा काढला आहे की, जर विज बिल भरले नाही तर कनेक्शन कट करायचं. 

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज विजेची गरज आहे. त्यांना नोटीस दिली पाहिजे, सवलत दिली पाहिजे. परंतु चार शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाहीत तर शंभर शेतकऱ्यांची भरलेले वीजबिले न बघता तात्काळ गावातीलच डीपीवरून दिले गेलेले कनेक्शन बंद करण्यात येत आहे. याचा खा. डॉ. भारती पवार यांनी संसदेत निषेध करत केंद्र सरकारच्या माध्यमातून या गंभीर मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ लक्ष देवून आज सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित न करता तात्काळ सुरळीत करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात केली आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...