Skip to main content

राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने दै.आपलं महानगरचे संतोष गिरी सन्मानित

निफाड |मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्या मार्फत पत्रकारिता, कृषी, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात येते.यातील राज्यस्तरीय आदर्श  पत्रकार  दर्पणरत्न पुरस्कार २०२१ पुरस्कारासाठी महाराष्ट्र गुणरत्न अवार्ड या करिता दैनिक आपलं महानगरचे निफाड तालुका प्रतिनिधी संतोष राजगिर गिरी यांना मंगळवारी नाशिकस्थित औरंगाबादकर सभागृहात सन्मानित करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी, जबाबदारीचे भान ठेवत पत्रकारिता करणाऱ्या संतोष गिरी यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे व विश्वस्त मीनाक्षी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.स्वामी श्रीकंठानंदजी, साहित्यिक रमेश आव्हाड मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, कायदेशीर सल्लागार सुरेंद्र सोनवणे, दैनिक सकाळचे पत्रकार विजयकुमार इंगळे, मानव धन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, तर पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष एल .एस.  दाते कार्याध्यक्ष शशिकांत सेलूकर, शिक्षण तज्ञ मनीषा कदम, मानद सल्लागार प्रकाश सावंत प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत गावंड अमोल सुपेकर आदींसह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत  असून अखिल भारतीय पुरोगामी प्रसारमाध्यमं पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे, महासचिव विलास पाटील, संघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष दिगंबर मराठे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड माजी आमदार अनिल पाटील कदम ,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णाताई जगताप, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी  बनकर, पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर, सारोळे खुर्दचे सरपंच दत्तात्रय पाटील डुकरे आदींनी  राज्यस्तरीय  पत्रकार क्षेत्रात पुरस्कार मिळाल्याबद्दल  आदींनी अभिनंदन केले आहेत.


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...