Skip to main content

जीएसटीतील जाचक तरतूदी विरोधात व्यापाऱ्यांचा २६ फेब्रुवारीला देशव्यापी बंद: मेहुल थोरात

नाशिक| जीएसटीतील जाचक तरतूदी, नियमांमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करणे अवघड झाले आहेे. या जाचक तरतुदींविरोधात कॅटने (सीएआयटी) २६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे, अशी माहिती कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स राज्य समितीचे उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी दिली.
Traders-strike-nationwide-on-February-26-against-oppressive-provisions-in-GST-Mehul-Thorat
थोरात म्हणाले की, जीएसटीतील नियमांच्या सारख्या बदलांमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करणे अवघड झाले आहे. जाचक नियम व तरतुदीमुळे इन्स्पेक्टरराज आणि भ्रष्टाचार वाढीस लागेल. त्यामुळे अधिकारी केव्हाही नोंदणी रद्द करू शकता, अगदी शुल्लक चुकीमुळे केव्हाही जीएसटी नोंदणी क्रमांक रद्द करण्याची टांगती तलवार कायम लटकलेली असते. त्यातच दंड आणि शिक्षेची तरतूद ही आहे. अशा जाचक तरतुदींमुळे व्यापारी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. व्यापाऱ्यांना व्यापार करणे कठीण होईल असे थोरात यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे व्यापारी आणि विविध संघटनांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून सर्वांनी एकत्र येऊन जाचक नियमांना विरोध करून आपली शक्ती दाखवण्याचा निर्धार (सीएआयटी)कॅटनेे केला आहे. त्यासाठी बंद यशस्वी करण्यासाठी सर्व व्यापारी संघटनांनी कंबर कसली असून इतर संघटनांनी ही या बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले.

नाशिक सराफ असोसिएशनचा बंदला पाठिबा

नाशिक सराफ असोसिएशनने ही कॅटच्या २६ फेब्रुवारीच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. जीएसटीतील जाचक तरतूदी विरोधात काळया फिती लावून असोसिएशनतर्फे  विरोध दर्शवला  जाणार आहे, असे नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष नवसे आणि कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स राज्य समितीचे उपाध्यक्ष तथा सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी सांगितले आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...