Skip to main content

..अखेर सायखेड़ा गोदापात्रातील पानवेली काढण्यास सुरुवात; खंडू बोडके यांचे टाळे लावा आंदोलन स्थगित

संतोष गिरी
निफाड| तालुक्यातील गोदाकाठच्या गोदापात्रात दोन महिन्यांपासून अडकलेल्या पानवेली काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र राज्य बियाने उपसमितीचे सदस्य, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या शिवसेना स्टाईल "टाळे लावा" आंदोलनाचा धसका घेत आज सोमवारी (दि.२९) पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने बोटिंच्या सहाय्याने पानवेली काढण्यास प्रारंभ केला. त्यामुळे खंडू बोडके-पाटील यांनी उद्या मंगळवार (दि.३०) पासून जाहीर केलेले कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला "टाळे लावा" आंदोलन स्थगित केले आहे. 
After-the-removal-of-Panveli-from-Saykheda-Godapatra-Khandu-Bodkes-Lock-Movement-suspended
गोदापात्रातील पानवेलीमुळे साथीचे आजार फैलावल्याने गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पानवेली काढण्याची वारंवार मागणी करूनही पाटबंधारे त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे आपल्या आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या खंडू बोडके-पाटील यांनी थेट कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्या कार्यालयाला ३० तारखेला टाळे ठोकून सायखेडा पुलावर जनआंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यामुळे धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी खंडू बोडके-पाटील यांना आंदोलन न करण्याची विनंती केली होती. मात्र खंडू बोडके-पाटील आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम असल्याने अखेर आज सोमवारी अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने पानवेली काढण्यास प्रारंभ केला. त्यापुर्वी खंडू बोडके-पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निकम, सायखेडचे शाखा अभियंता खैरनार, नांदूरमध्यमेश्वरचे शाखा अभियंता शरद नागरे यांच्यासह शरद कुटे, करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे यांच्यासमवेत पानवेलींची पाहणी करून चर्चा केली. 
यावेळी उपअभियंता निकम यांनी पानवेली काढण्यासाठी दोन पथके करणार असून सायखेड़ा, करंजगाव पुलावर अडकलेल्या पानवेली महीनाभरात बोटी व मनुष्यबळच्या सहाय्याने काढण्यात येतील असे सांगितले. तसेच सदर पानवेली नाशिक महानगरपालिका क्षेत्रातुन येत असल्याचे सांगितले. मात्र दरवर्षी गोदावरीला पानवेलीचा विळखा बसत असल्याने त्यावर निधीची तरदूत करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश खंडू बोडके-पाटील यांनी यावेळी दिले. कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशीही खंडू बोडके-पाटील यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. पानवेली पाहणीवेळी सायखेडचे माजी उपसरपंच शरद कुटे, करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे, करंजगाव शिवसेना गणप्रमुख सागर जाधव, माजी ग्रामपालिका सदस्य योगेश बोराडे, रमेश पाटील राजोळे, योगेश राजोळे आदि उपस्थित होते.


पानवेली काढण्यासाठी कायम स्वरुपी तरतूद असावी: बोडके

दरवर्षी पानवेलीमुळे गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यावर देखभाल दुरुस्ती अतंर्गत निधीची तरतूद करून कायमस्वरूपी उपाययोजना पाटबंधारे विभागाने करावी. पाटबंधारे विभागाच्या मनमानीला चाप बसविण्यासाठी गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या उचल पाणी परवानगीसाठी यापुढे आपण लढा देणार आहोत.

श्री.खंडू बोडके-पाटील
माजी सरपंच करंजगाव
सदस्य : महाराष्ट्र राज्य बियाणे,
उपसमिति, मंत्रालय मुंबई.


(फ़ोटो)
१) पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निकम, खैरनार यांच्याशी पानवेलींसंदर्भात चर्चा करताना खंडू बोडके-पाटील, शरद कुटे व शिष्टमंडळ

२) सायखेड़ा येथे बोटिंच्या सहाय्याने पानवेली काढण्यास केलेला प्रारंभ

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...