Skip to main content

बोकडदरे १००% कृषी वीज बिल भरणारे महाराष्ट्रातील अव्वल गाव

संतोष गिरी
निफाड| तालुक्यातील पुर्व भागातील व येवला- लासलगाव या विधानसभा मतदार संघातील बोकडदरे येथे विंद्युत वितरण कंपनीने ग्रामसभा घेऊन कृषी विज धोरण २०२० ही योजना व गावाचा फायदा या बाबी समजावून सांगितल्या. तसेच बोकडदरे येथे विज बिल भरण्यासाठी चक्क स्पर्धा होऊन १८०  विज ग्राहकांनी बावीस लाख रुपये भरना करुन १००% विज बिल भरणा केल्याने हे गाव महाराष्ट्रात अव्वल ठरले आहे, अशी माहिती विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता विजयानंद काळे यांनी दिली. ते नैताळे येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.    
Bokdadare-is-the-top-village-in-Maharashtra-paying-100%-agricultural-electricity-bill
महाराष्ट्रात सर्वत्र विज बिल भरणा करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत, याचाच एक भाग म्हणून निफाड या उपविभागातील बोकडदरे येथे विद्युत वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता बंकट सुरवसे व सहाय्यक अभियंता पुजा वाळुंज यांनी बोकडदरे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेस उपस्थित राहुन कृषी विज धोरण २०२० ही योजना सांगून गावासाठी योजना किती फायद्यची आहे हे समजावून सांगितले होते.

बोकडदरे ग्रामस्थानी योजना समजून घेतल्याने विज बिल भरणा करण्यासाठी चक्क स्पर्धा झाली व अतिशय कमी कालखंडात १००% विज बिल भरणा झाला यातुन विद्युत वितरण कंपनीला २२ लाख रुपयांचा महसुल मिळाला त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता विजयानंद काळे यांनी या परिसराला भेट दिली.नैताळे ता.निफाड येथे कोविड- १९ चे नियम पाळून एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करुन  बोकडदरे येथील शेतकऱ्यांचा सन्मान केला. १००% विज बिल भरणा करुन या गावाने महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे. यावेळी ,नाशिक शहर मंडळ अधिक्षक अभियंता प्रविण दरोली, कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड, सहाय्यक अभियंता कैलास शिवदे निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, सहाय्यक अभियंता कु. पुजा वाळुंज, जनमित्र अतुल गजबे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन भाऊराव दराडे यांनी केले कार्यक्रमास परिसरातील शेतकरी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.         

बोकडदरे गावाने सर्वांसमोर आदर्श ठेवला: सुरवसे

बोकडदरे या गावाने कृषी पंपाचे १००% विज बिल भरुन परिसरात आदर्श निर्माण केला आहे इतर गावानी ही कृषी धोरण २०२० या योजनेत भाग घेऊन आपला व परिसराचा लौकिक वाढवावा  
                            
बंकटजी  सुरवसे               
उप कार्यकारी अभियंता 



Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...