Skip to main content

निफाडसाठी जनसुविधा योजनेअंतर्गत १ कोटी २० लाखाचा निधी: आ. दिलीप बनकर

संतोष गिरी
निफाड| जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ग्रामपंचायतीना जनसुविधा साठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येतेे, या योजनेअंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातील सुमारे २३० ग्रामपंचायतीच्या कामांना प्रशासाकीय मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी सुचविलेल्या सुमारे १ कोटी  २० लाख रुपयाच्या कामांना मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. दिलीपराव बनकर यांनी पत्रकारांना दिली.
निफाड तालुक्यातील या ग्रामपंचायतींना  संबंधित निधी मंजूर झाला असून, त्यामध्ये ओणे येथे दशक्रिया शेड बांधणे १० लाख, महाजनपूर येथे दशक्रिया शेड बांधणे १० लाख, गोरठाण येथे स्मशानभूमी  अनुषंगिक कामे करणे १० लाख, नांदुर्डी येथे स्मशानभूमीत निवारा शेड बांधकाम करणे १० लाख, नारायणटेंभी येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, बेहेड येथे  स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, पिंपळस येथे दशक्रियाविधी शेड बांधणे २० लाख, नैताळे  येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, वावी येथे दशक्रियाविधी शेड बांधणे १० लाख, शिंपीटाकळी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे २० लाख आदी कामांचा समावेश आहे. ही कामे मंजूर केल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ याचे आमदार दिलीपराव बनकर यांनी आभार मानले

निफाडच्या विकासासाठी कटिबध्द: आ.बनकर
निफाड तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, त्यासाठी न बोलता निफाड तालुक्यातील थांबलेला विकासाला चालना देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीत असून covid-19 या संकटातही  तालुक्यातील विकास कामांसाठी जेवढा निधी आणता येईल तेवढा आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे.

दिलीपराव बनकर, आमदार निफाड

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...