Skip to main content

लासलगावला कांदा लिलाव सलग ५ दिवस बंद; कोट्यवधीची उलाढाल ठप्प

संतोष गिरी 
लासलगाव| सणासुदीचा काळ आणि लागून आलेल्या सुट्यांमुळे आशिया खंडातील अग्रेसर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव ५ तर धान्य लिलाव ७ दिवस बंद आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार असून सणासुदीला दोन पैसे गाठीशी बांधता येतील या आशेवर असलेले शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहे. दि. १ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत होणार आहे.
Lasalgaon-onion-auction-closed-for-5-days-in-a-row-Billions-turned-out
बाजार समिती शनिवारी, रविवार दिनांक २७ व २८ मार्च बंद, तर        सोमवार दिनांक २९ मार्च धुलीवंदन आणि मंगळवार  दि.३० आणि ३१ रोजी मार्च वर्ष अखेर लिलाव बंद राहणार असून गुरुवार दिनांक १ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू होतील. तसेच शुक्रवार दिनांक २ एप्रिल रंगपंचमी निमित्त समिती बंद असेल, तसेच सोमवार दिनांक २९ मार्च  २०२१ पासून शनिवार दिनांक ३ एप्रिल २०२१ पर्यंत धान्य लिलाव बंद राहतील. सोमवार दिनांक ५ एप्रिल २०२१ पासून धान्य लिलाव पूर्ववत सुरू होतील असे सूत्रांनी सांगितले आहे. शेवटचा महिना मार्चमधील अखेरचे दिवस, होळी, धुलिवंदन असे सण आणि साप्ताहिक सुट्ट्या आहेत. 

कोरोनाचा कांदा उत्पादकांना फटका

मार्च महिन्यातील अखेरचे दिवस असूनही लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक अद्यापही मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन उन्हाळ कांद्याची आवक दाखल झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयांच्या आत आले असून सर्वसाधारण ८०० ते ९०० रुपये कांद्याला बाजार भाव मिळत आहे.

तोट्यात विक्री

कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत आहे. कोरोनाचं संकट त्यात पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सात दिवस मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्या निमित्त बँकेतून पैसे मिळणार नसल्याने लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा व धान्यचे लिलावाचे कामकाज बंद राहणार आहे. यामुळे लासलगाव बाजार समिती आवारात शुकशुकाट दिसत आहे. सलग ७ दिवस बाजार समिती बंद राहिल्यानं कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार असल्यानं कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होणार.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...