Skip to main content

निफाडच्या द्राक्ष उत्पादकांवर कारवाई होणार म्हटल्यावर मा.आ. कदमांचा थेट मातोश्रीवर संपर्क...नेमका काय आहे प्रकार वाचा!

संतोष गिरी
निफाड| मुंबईत शिवाजी पार्क येथे निफाडच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष स्टॉल लावला होता, पण मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी स्टॉल लावण्यास मज्जाव केला. स्थानिक बाजारात भाव नाही, मुंबईत विक्रीसाठी आलेली द्राक्ष विकू दिली जात नाही अशा द्विधा मनस्थिती असलेल्या शेतकऱ्यांनी थेट माजी आ. अनिल कदम यांच्याकडे कैफियत मांडली, मग काय कदम यांनी थेट मातोश्रीवर संपर्क करत या घटनेची कल्पना दिली. लागलीच शिवसैनिकांनी याठिकाणी धाव घेत कारवाई टाळली आणि द्राक्ष विक्रीसाठीची व्यवस्था करुन दिली कदम यांच्या पुढाकाराने त्यामुळे निफाडच्या द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला.
Mumbai-Municipal-Corporations-action-against-Niphads-grape-growers-was-averted-by-the-initiative-of-Kadam
महाराष्ट्रातील निफाड तालुका हा देशातील कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो तसेच द्राक्षपंढरी म्हणूनही  ओळखला जातो. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून नैसर्गिक आपत्ती व कोरोनामुळे द्राक्ष उत्पादक अक्षरशः देशोधडीला लागले आहे. सुजलाम  सुफलाम् समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या ज़िद्दीने कमावलेली निर्यातक्षम द्राक्षे कवडीमोल भावाने शेतकरी विकत आहेत. मात्र पिकेल ते विकेल या राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्या संकल्पनेतील विक्री व्यवस्था नाशिकच्या द्राक्ष मंडळाने प्रत्यक्षात उतरवत निफाडची द्राक्ष मुंबईत विक्री करण्यासाठी पाठबळ दिले.
त्याअनुषंगाने खेरवाडीचे प्रगतिशील द्राक्ष उत्पादक बाबाजी संगमनेरे व ग्रामपंचायत सदस्य कैलास संगमनेरे यांनी आपली द्राक्षे बुधवारी मुंबईत शिवाजी पार्क परिसरात विक्रीचा स्टॉल लावला होता, मात्र कोरोनाचे कारण देत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना द्राक्ष विक्रीस मज्जाव केला. याची तक्रार बाबाजी संगमनेरे यांनी निफाडचे शिवसेनेचे माजी आ. अनिल कदम यांच्याकडे केली,त्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. योगायोगाने मुंबईला मंत्रालयात असलेले माजी आ. अनिल कदम यांनी तातडीने शिवसेना भवनात संपर्क साधून शिवसेनेच्या पदाधिकारयांना शिवाजी पार्क येथे घटनास्थळी पाठवले. शिवसेना पदाधिकारी यांच्या दणक्यानंतर त्या शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीचा तात्पुरता परवाना मिळवून देत द्राक्ष विक्री स्टॉल पूर्ववत केला.
त्यामुळे चांगल्या दराने निफाडची द्राक्ष विकली जाऊन खेरवाडीच्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून कोरोनाच्या या महामारीत अनिल कदम यांनी केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.  या घटनेची  निफाड तालुक्यातील सोशल मीडियात चांगली चर्चा रंगली होती. माजी आमदार अनिल कदम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल खेरवाडीचे द्राक्ष उत्पादक शेतकरी व द्राक्ष विद्यमान मंडळ यांनी आभार मानले आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...