Skip to main content

मेट भुजबळ नॉलेज सिटीकडून अनाथ बालकांना मदतीचा हात

नाशिक| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनाथ मुलांना सांभाळनाऱ्या आधारतीर्थ संस्थेला अन्नधान्याची व किराणा मालाची कमतरता भासत असल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. याबाबत आज मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ संस्थेला भेट देऊन सदर वस्तूंचे वाटप केले. 
A-helping-hand-to-orphans-from-Met-Bhujbal-Knowledge-City



कोरोनाच्या कालावधीत मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक यांच्या वतीने समाजिक जबाबदारीतून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाना, कर्नाटक, राजस्थान इत्यादी ठिकाणी परराज्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था मेट मार्फत करण्यात आली होती. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांना मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतीगृहात विलीगीकरण कक्षाची निर्मिती करून त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाशिक शहरातील विभागीय क्रीडा संकुलातील मीनाताई ठाकरे स्टेडीयम येथे २०० ऑक्सिजन व १०० सीसीसी असे एकूण ३०० बेड्सचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून रुग्णसेवा करण्यात येत आहे.


सामाजिक जबाबदारीतून मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून कोरोनाच्या कालावधीत सामाजिक कार्य अविरतपणे सुरु आहे. त्याचमाध्यमातून त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ येथील अनाथ मुलांना मदतीचा हात दिला आहे. आज संस्थेच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते या संस्थेला दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य व किराणा मालाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे येथील अनाथ मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


यावेळी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीबद्दल आधारतीर्थ संस्थेचे संचालक त्र्यंबकराव गायकवाड यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.


यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, कैलास मुदलियार, समता परिषदेचे शहर उपाध्यक्ष हर्षल खैरनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...