Skip to main content

मेट भुजबळ नॉलेज सिटीकडून अनाथ बालकांना मदतीचा हात

नाशिक| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनाथ मुलांना सांभाळनाऱ्या आधारतीर्थ संस्थेला अन्नधान्याची व किराणा मालाची कमतरता भासत असल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. याबाबत आज मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ संस्थेला भेट देऊन सदर वस्तूंचे वाटप केले. 
A-helping-hand-to-orphans-from-Met-Bhujbal-Knowledge-City



कोरोनाच्या कालावधीत मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक यांच्या वतीने समाजिक जबाबदारीतून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाना, कर्नाटक, राजस्थान इत्यादी ठिकाणी परराज्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था मेट मार्फत करण्यात आली होती. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांना मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतीगृहात विलीगीकरण कक्षाची निर्मिती करून त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाशिक शहरातील विभागीय क्रीडा संकुलातील मीनाताई ठाकरे स्टेडीयम येथे २०० ऑक्सिजन व १०० सीसीसी असे एकूण ३०० बेड्सचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून रुग्णसेवा करण्यात येत आहे.


सामाजिक जबाबदारीतून मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून कोरोनाच्या कालावधीत सामाजिक कार्य अविरतपणे सुरु आहे. त्याचमाध्यमातून त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ येथील अनाथ मुलांना मदतीचा हात दिला आहे. आज संस्थेच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते या संस्थेला दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य व किराणा मालाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे येथील अनाथ मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


यावेळी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीबद्दल आधारतीर्थ संस्थेचे संचालक त्र्यंबकराव गायकवाड यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.


यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, कैलास मुदलियार, समता परिषदेचे शहर उपाध्यक्ष हर्षल खैरनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...