Skip to main content

आरोग्य विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्यायावत करण्याची प्रक्रिया सुरु

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्यायावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यापीठाची सहावी यथार्थदर्शी योजना (Perspective Plan)  अद्यायावत करण्यासाठी आरोग्य शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, नागरिकांकडून अभिप्राय किंवा सूचना मागविण्यात येत आहे. विद्यापीठाचा बृहत आराखडा सर्वसमावेशक असावा याकरीता विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलसचिवडॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाचे विविध प्राधिकरणाचे सदस्य प्रयत्नशिल आहेत.

The-process-of-updating-the-master-plan-of-the-Health-University-has-started

राज्यात आरोग्य विज्ञान शिक्षण सुविधांचे समन्याय वाटप व्हावे या दृष्टीकोनातून उच्चतर शिक्षणाच्या संस्थांची स्थाने निश्चित करण्यासाठी शैक्षणिक विकासाची यथार्थदर्शी विद्यापीठ योजना (Perspective Plan) तयार करण्यात येतो. शासनाने निर्देशित केल्यानुसार राज्यातील दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा मिळण्यासाठी महाविद्यालय सुरु करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येते. विद्यापीठाचा सन 2022 ते 2027 या कालावधी करीता बृहत आराखडा करण्यात येणार आहे. या संदर्भात आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी विद्यापीठास सूचना, मार्गदर्शन करावे. सदर मार्गदर्शन, सूचना विद्यापीठास टपाल किंवा ई-मेल व्दारा विद्यापीठाकडे सादर पाठविण्याबाबत आवाहन       करण्यात येत आहे.


विद्यापीठ अधिनियमानुसार पाच वर्षांकरीता अद्यायावत बृहत आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये राज्यातील विविध विद्याशाखांचे महाविद्यालये, स्थानिक लोकसंख्या, जिल्हा किंवा तालुक्यातील महाविद्यालयांची संख्या, महाविद्यालयातील अंतर, महापालिकेस संलग्नित महाविद्यालय आदी बाबी महत्वपूर्ण असतात. याकरीता विद्यमान सन्माननीय मा. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य, विविध संस्थांचे संस्थाचालक, विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, समाजसेवक, जिल्हा शल्य चिकीत्सक यांची मते विचारात घेण्यात येतात. 
          

विद्यापीठाची स्थापना दि. 03 जून 1998 मध्ये झाली. आजपावेतो पाच बृहत आराखडा तयार करण्यात आले होते. या अनुषंगाने विद्यापीठाचा सन 2022 ते 2027 कालावधीसाठी बृहत आराखडा तयार करण्याचे कामकाज सुरु असल्याचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले.
विद्यापीठाचेwww.muhs.ac.in  संकेतस्थळावर विद्यापीठ बृहत आराखडा संदर्भात माहिती प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाच्या नियोजन विभागाचे प्र.संचालक डॉ. राजीव आहेर यांनी सांगितले. विद्यापीठाची सहावी यथार्थदर्शी योजना दर्जेदार व्हावी याकरीता नागरिकांनी व संबंधितांनी आपले अभिप्राय किंवा सुचना असल्यास अधिकृत ई-मेलवरुन विद्यापीठास planning@muhs.ac.in  ईमेलवर पत्त्यावर किंवा टपालाव्दारे दि. 10 जून 2021 पर्यंत पाठवावेत. विहित वेळेत प्राप्त अभिप्रायांचा विद्यापीठाकडून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. तरी संबंधितांनी व नागरिकांनी आपले अभिप्राय व सूचना विद्यापीठाकडे सादर कराव्यात.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...