Skip to main content

औरंगाबाद शहर अनलॉक! शहरातील सर्व निर्बंध शिथिल

औरंगाबाद| महानगरपालिका क्षेत्रातील निबंध पूर्णतः उठवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला असून त्याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. यामुळे औरंंगाबाद शहर तब्बल १०० दिवसांनी पुन्हा एकदा पुर्ववत सुरू होणार आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.२४ टक्के आणि भरलेल्या ऑक्सीजन बेड्सची संख्या २२.१९ टक्के असल्यामुळे औरंगाबाद महापालिका क्षेत्र शासनाने निर्धारित केलेल्या पहिल्या गटात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील निबंध पूर्णतः शिथील करण्यात आले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात ७ जूनच्या सकाळी ७ वाजेपासून नवीन सुधारित आदेश लागू होतील. 
Aurangabad-city-unlocked-All-restrictions-in-the-city-relaxed
फोटो: फाईल

अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने - अत्यावश्यक सेवा आणि व्यवसायाची दुकाने नियमितपणे सुरू राहतील. मास्क, शारीरिक अंतर आणि सुरक्षा उपकरणांचा वापर अनिवार्य राहील. 

इतर सर्व व्यवसाय व दुकाने - अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकानेही नियमितपणे उघडता येतील. अत्यावश्यक सेवेच्या याही दुकानांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आणि निर्देशांचे पालन करावे लागेल. 

मॉल्स / चित्रपटगृहे / नाटयगृहे - औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे नियमितपणे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी - महापालिका क्षेत्रातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळीही नियमितपणे उघडता येतील. मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आदी बाबींचे पालन करावे लागेल. 

 सार्वजनिक ठिकाणे / क्रीडांगणे, मोकळयाजागा, उद्याने / बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. 

 खासगी कार्यालये - सरकारच्या ४ जूनच्या आदेशानुसार सर्व आस्थापना जसे, खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्तसंस्था व गैर - बँकिंग वित्त - संस्था इत्यादी कार्यालये नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील. 

 कार्यालयीन उपस्थिती - शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापना नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

  क्रीडा, चित्रीकरण, विवाह समारंभ, अंत्यविधी, स्नेहसंमेलने, सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम सभा / निवडणुका नियमितपणे घेण्यास परवानगी राहील. 

 बांधकाम, कृषी संबंधित बाबी, ई-कॉमर्स वस्तू व सेवा नियमितपणे सुरू राहतील. 

 औरंगाबाद महापालिका क्षेत्रात जमावबंदी किंवा संचारबंदी लागू राहणार नाही. 

 जीम / सलुन / ब्युटी पार्लर / स्पा / वेलनेस सेंटर नियमित सुरू करता येतील. 

 सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहिल. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील. 

 आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार , टॅक्सी , बस) व रेल्वेने पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहील. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील. तथापि जर प्रवासी लेवल ५ मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई - पास आवश्यक राहील. 

 *उपरोक्त सर्व बाबींसाठी कोरोना अनुकूल वर्तन अनिवार्य आहे.* 

 *निर्बंध शिथिलतेबरोबरच अटीही लागू* 

 सर्व उदयोग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचा-यांना निगेटीव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता १५ दिवसांकरिता) निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवालाशिवाय दुकान / व्यवसाय सुरु करता येणार नाही.

 या नियमांचे उल्लंघन केल्यास कोराना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यंत संबंधित दुकान / आस्थापना बंद ठेवण्यात येईल, तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाप्रमाणे दंड आकारण्यात येईल.

या निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात (नागरी भागात) आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका औरंगाबाद यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी इंसिडेंट कमांडर तथा जिल्हाधिकारी / तहसिलदार, औरंगाबाद यांची राहील. 

 सदरचे आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे

सोर्स:DIOऔरंगाबाद

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...