Skip to main content

माजी आ. गणपतराव देशमुख यांचे निधन

मुंबई| सोलापूरमधील सांगोला विधानसभेचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचने निधन झाले आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गणपतराव देशमुख हे तब्बल 11 वेळा आमदार होते. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे.
Ex-mla-Ganapatrao-Deshmukh-passed-away


गणपतराव यांनी तब्बल 54 वर्ष सांगोला विधानसभा मतदार संघांच प्रतिनिधित्व केले. एकाच मतदारसंघातून 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम देशमुख यांनी केला. गणपतराव यांच्या निधनाने राज्यातील राजकारणातला ध्रुवतारा हरपल्याची भावना जनसामांन्यातून व्यक्त केली जात आहे.

त्यांची सामािजक, राजकीयक कारकीर्द मोठी होती्र ते 1950-54 शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत विद्यार्थी सभेचा कार्यकर्ता होते. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग व अनेक वेळेस कारावासही भोगला आहे. 1962- पासुन शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती व चिटणीस मंडळाचे सदस्य होते. 1965- अन्नधान्य चळवळीत येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.  1969-1975 महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे सरचिटणीस  होते.  1969 संस्थापक अध्यक्ष,  सांगोले तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, या संस्थेचे सांगोले येथे न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि विज्ञान महाविद्यालय सांगोला तर 1972-75  महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळ मुंबईचे सदस्य होते. देशमुख् यांनी 1975 आणीबाणीच्या काळात खटला आणि तुरूंगवास भोगला आहे. आटपाडी येथील माण गंगा सहकारी साखर कारखाना व सांगोला तालुक्यातील सांगोले तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत सक्रिय सहभाग होता.

सांगोले शाखा पाटबंधारे प्रकल्प क्रमाक्र  4  व 5 ,टेंभू व म्हैसाळ प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी तसेच कृष्णा खोरे महामंडळाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील हाेते. रोजगार हमी योजनेखाली बोर, डाळिंब व अन्य फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी व विक्रीसाठी सहकारी फळबाग उत्पादक शेतकरी संघ स्थापन करून देशात व परदेशात फळ विक्री ची व्यवस्था करण्यात त्यांचा पुढाकार होता.

महाराष्ट्र विधानसभा सदस्य 1962-67, 1967-72, 1974-78, 1978-80, 1980-85, 1985-90, 1990-95, 1999-2004, 2004-2009, 2009-2014,  2014  ते 2019  सदस्य होते.   2014  साली  निवडून येवून जागतिक रेकॉर्ड केले. विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्य विधानसभा--1977, पुलोद शासन-- जुलै 1978 ते फेब्रुवारी 1980 पर्यंत कृषी,  ग्रामविकास आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री, पुरोगामी लोकशाही आघाडी शासन --19 ऑक्टोबर 1999 ते मे 2002 पर्यंत पणन , रोजगार हमी योजना मंञी,  मे  2002 मध्ये मंत्री पदाचा राजीनामा दिला, विधान सभेचे हंगामी अध्यक्ष - मार्च 1990 , नोव्हेंबर 2004, आणि पुन्हा तिसर्‍या वेळेस 9 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्राचे राज्यपालांकडून हंगामी अध्यक्ष म्हणून निवड, शासकीय समिती सदस्य-- 1980-82 महाराष्ट्र विधान मंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष. विधान मंडळाच्या अंदाज,  लोकलेखा, कामकाज सल्लागार, उप. विधान, सार्वजनिक उपक्रम व विनंती अर्ज इत्यादी समित्यांचे सदस्य होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...