Skip to main content

पोलीस कुंटुंबियांचे लसीकरण सुरू; पहिल्याच दिवशी १६० कुटुंबीयांनी घेतला लाभ

नाशिक| कोरोना महामारीच्या काळात प्रामाणिक कर्तव्य बजावणारे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने पोलीस मुख्यालयात लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी १६० कुटुंबीयांनी घेतला लाभ आहे. पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी जास्तीत जास्त पोलीस कुटुंबीयांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
Vaccination-of-police-families-started-More-and-more-police-families-should-be-vaccinated-Commissioner-of-Police-Deepak-Pandye
कोरोना महामारी व संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने सर्वत्र भयंकर परिस्थिती असतांना शहराचे  पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी पोलीस अधिकारी, अमंलदार व पोलीस कुंटुंबियाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली, पोलीस आयुक्त व पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि श्री. महेंद्र चव्हाण, पोलीस कल्याण विभाग व डॉ . श्री. प्रशांत देवरे, वैदयकिय अधिकारी , पोलीस रुग्णालय, नाशिक यांनी विशेष परिश्रम घेवून पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे लसीकरणाचा पहिला डोस ९३.६ टक्के व दुसरा डोस ७१.५३ टक्के यशस्वीपणे पूर्ण केला.
आता पुन्हा पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांच्या संकल्पनेतून पोलीस कुंटुंबियाकरीता आजपासुन पोलीस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक १५ येथे कोविशिल्डचे लसीकरण सुरू करण्यात आले आले. पहिल्याच दिवशी १६० पोलीस कुंटुंबियांनी याचा लाभ घेतलेला आहे. यापुढेही आठवडयातुन दोन वेळा लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. तरी पोलीस कुंटुंबियांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी  पोलीस कुंटुंबियांना केले आहे. सदर लसीकरणाची सुविधा पोलीस मुख्यालयात स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारून केल्यामुळे पोलीस कुंटुंबियांनी समाधान व्यक्त केलेले आहे. 

या उपक्रमाकरीता नाशिक महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले असून उपलब्ध लसीनुसार यापुढे ही कोविशिल्ड या लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास श्री. दिपक पाण्डेय , मा . पोलीस आयुक्त, नाशिक शहर , श्रीमती पौर्णिमा चौगुले - श्रींगी, पोलीस उपआयुक्त ( मुख्यालय ), श्री. वसंत मोरे सपोआ (प्रशासन ), श्री. महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक , पोलीस कल्याण, श्री . डॉ . प्रशांत देवरे, वैदयकिय अधिकारी, पोलीस रुग्णालय, नाशिक व त्यांचा स्टाफ तसेच नाशिक महानगर पालिकेचे लसीकरण प्रमुख डॉ.श्रीमती अजिता साळुखे व डॉ . जगताप हे लसीकरण स्टाफसह उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...