Skip to main content

सामाजिक न्यायाची वसतीगृहे, निवासीशाळा बनली आरोग्य मंदिरे! हजारो कोरोना रुग्णांचा आसरा

पुणे| नाशिक| कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत सामाजिक विभागाची शासकीय वसतिगृह व निवाशी शाळांमध्ये आरोग्य विभागाने तात्पुरती कोवीड सेंटर उभारली. यामुळे हजारो रूग्णांना आरोग्य सुविधा मिळणे सोपे झाले. सामाजिक न्याय विभागाच्या  वसतिगृह व निवाशी शाळांनी आरोग्यमंदिर होतं महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे.
Health-justice-dormitories-residential-temples-became-health-temples-Shelter-for-thousands-of-Corona-patients
दुसऱ्या लाटेत कोविड-19 ची परिस्थिती गंभीर बनल्याने समाजातील अनेक घटकांना त्यामुळे नुकसान सोसावे लागले तर, अनेकांना आपले जवळच्या व्यक्तीस गमवावे लागले आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समाजातील असंख्य घटकांनी कशोसीने प्रयत्न केले. सामाजिक घटकांबरोबर विविध विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना देखील सदर परिस्थितीला सामोरे जावे लागले. शासनाच्या विविध यत्रणांचा सहभाग हा देखील तितकाच महत्वाचा ठरला आहे. 
दुसऱ्या लाटेत वसतीगृहे व निवासीशाळा ही आरोग्य मंदिरे बनल्याने राज्यातील हजारो रुग्णांना याद्वारे आरोग्य दानाचे महान कार्य झाले आहे. राज्यातील एकूण 441 शासकीय वसतीगृहातून जवळपास 45 हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय दरवर्षी होत असते. राज्यात अनेक ठिकाणी वसतिगृहांच्या स्वतंत्र सुंदर अशा इमारती उभ्या राहिल्या आहेत. या सुसज्ज इमारतीमधील सोयी-सुविधांमुळे कोविड-19 च्या कालावधी शासनाच्या आरोग्य यंत्रणाचा भार हलका झालेचे दिसून आले आहे. दुसऱ्या लाटेत ‘कोविड’ ची परिस्थिती गंभीर बनल्याने रुग्णालये हाऊस फुल झाली होती. अशा वेळी राज्यातील रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी शासकिय वसतीगृह व निवासी शाळांनी देवदुताची भूमिका बजावली असल्याने त्यातून आरोग्य दानाचे कार्य पार पडले आहे.
राज्यातील एकुण 441 शासकीय वसतीगृहांपैकी जवळपास 211 शासकिय वसतीगृहे ही त्या- त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेतलेली आहेत. त्यात 182 वसतीगृहे ही शासकिय इमारतीतील असून 29 वसतीगृहे ही भाड्याच्या इमारतीत आहेत. ह्या 211 शासकिय वसतीगृहामुळे त्या- त्या ठिकाणी हजारो रुग्णांची सोय जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. विशेष म्हणजे बहुतांशी शासकिय वसतीगृहातील अधिकारी/कर्मचारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखालील कोविड संदर्भात कामकाज केले आहे. कोविड च्या रुग्णाना देखील सदर शासकीय वसतीगृहाचे वातावरण व  सोईसुविधा भावल्या असल्यामुळे  कोविड आजारावर त्यांनी यशस्वी मात केली आहे.

राज्यात अनुसुचित जातीच्या मुलामुलींकरिता 90 निवासीशाळा असुन त्यापैकी 63 निवासीशाळा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड सेन्टर सुरु केली होती. सदर निवासी शांळामध्ये 5 ते 10 वी पर्यंत शिक्षणाबरोबरच निवासाची देखील सोय करण्यात आलेली आहे. नाशिक विभागात 53 शासकिय वसतीगृहांपैकी 25 शासकिय वसतीगृहे तर 10 निवासी शाळांपैकी 6 निवासीशाळा ह्या स्थनिक प्रशासनाने ताब्यात घेतल्या होत्या. त्यात नाशिक जिल्ह्यात नासर्डी पूला समोरील समाज कल्याण परिसरात 3 वसतिगृह, आडगांव येथील  मुलांचे शासकीय वसतिगृह, येवला, पिंपळगांव येथील शासकीय वसतिगृह व निवाशी शाळा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्या. अशाच प्रकारे धुळे, नंदुरबार, जळगांव व अहमदनगर या जिल्ह्यांमधील शासकीय वसतिगृह व निवासी शाळा कोविड सेंटर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

सामजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा, वस्तीगहाचे योगदान महत्त्वपूर्ण: नारनवरे

 “संपूर्ण जगासह राज्यात आल्येल्या कोविड संकटात सामाजिक न्याय विभागाच्या शासकिय वसतीगृहे व निवासी शाळा यांचे योगदान महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात ही शासकीय वसतीगृहे व निवासीशाळा सुरु करण्यासाठीच्या उपाययोजना विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.”

डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...