Skip to main content

मल्याळी असोसिएशनतर्फे कोकणातील पूरग्रस्तांना मदत

नाशिकरोड|प्रतिनिधी|ऑल इंडिया मल्याळी असोसिएशनतर्फे (नाशिक विभाग)  कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य ट्रक  भरून कोकण प्रांताकडे रवाना करण्यात आले. प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा तडवी, नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे या लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वज दाखवून ट्रक रवाना करण्यात आला. 
याप्रसंगी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, नगरसेविका सौ संगिता गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मल्याळी असोसिएशनचे (नाशिक विभाग) कार्य कौतुकास्पद असून या असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापूर्वीही असोसिएशनने भरपुर मदत केली आहे. पूरग्रस्त कोकण भागात अनेक लोकं उघड्यावर आहेत. त्यांना मल्याळी असोसिएशनने मदतीचा हात पुढे करून बांधिलकी जपली. त्यांच्या कार्याला सर्व लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा, असे गौरवोद्गार नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी काढले. मल्याळी असोसिएशनचे प्रेसिडेंट रणजित नायर यांनी सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), असोसिएशनचे चेयरमेन कोरुथ कोशी, शिबू जोस, एलिझाबेथ सत्यन, मोहन पवार, नीतू रत्नाम, प्रसन्ना रत्नाम, डिनो डारली आदी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


असोसिएशनचे काम कौतुकास्पद: पगारे

ऑल इंडिया मल्याळी असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपून कोकणात मदत पाठवली. मल्याळी असोसिएशन (नाशिक विभाग)चे कार्य कौतुकास्पद आहे.

सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका, प्रभाग क्र. १६ 

१३ वर्षापासून नियमित मदत कार्य: नायर

मागील १३ वर्षांपासून मल्याळी असोसिएशन नाशिक विभागाचे कार्य नियमित सुरू असून नैसर्गिक आपत्तीत गरजूंना मदत करणे, हे आमचे दायित्व आहे. मल्याळी असोसिएशन ही समाजाच्या भल्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे.

रणजित नायर, प्रेसिडेंट, 
ऑल इंडिया मल्याळी असोसिएशन (नाशिक विभाग).

-----

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...