Skip to main content

रायुकाँ कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहावे: मेहबूबभाई शेख

नाशिक| राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आवाहन नाशिक तालुका आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी केले आहे. दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मालेगाव, सटाणा, चांदवड, देवळा नाशिकच्या दौऱ्यावर असतांना मेहबूबभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी विविध बैठका, प्रवेशासोहळे आणि आढावा बैठकांचे आयोजन केले होते.
Rayukan-activists-should-be-ready-for-the-upcoming-local-body-elections-Mehboobbhai-Sheikh
नाशिक तालुका आणि देवळाली मतदारसंघ बैठकीत युवकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागण्यासाठी मार्गदर्शन केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक लोकसभा अध्यक्ष  कोंडाजीमामा आव्हाड होते. प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचे स्वागत तालूका अध्यक्ष गणेश गायधनी आकाश पिंगळे, विशाल गायकर यांनी केले. यावेळी  जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम  कडलग, प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, महीला जिल्हा अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे,आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले की, युवकांनी फक्त आदरणीय शरदचंद्र पवार या एका विचाराने प्रेरित होऊन पक्षा साठी झोकून काम करावे, पक्ष तुम्हाला निश्चित न्याय देईल. सर्वांनी एकजुटीने काम करावे. नाशिक हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा एक पुरोगामी जिल्हा आहे. प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांना संघर्षातूनच संधी मिळते तेव्हा संघर्ष करण्यास डगमगून जाऊ नये. जे पक्षाच्या पडत्या काळातही पक्षासाठी झटत राहिले त्यांना पक्षात प्रथम न्याय दिला जाईल. यावेळी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम  कडलग यांनी प्रास्ताविक केले तर नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गायधनी यांनी बूथ कमिटी, गट आणि गण तसेच पदाधिकारी यांचा अहवाल सादर केला.

यावेळी देवळाली विधानसभा अध्यक्ष पदी तुषार खांडबहाले तसेच विधानसभा कार्याध्यक्षपदी चेतन जाधव व युवक जिल्हा उपाध्यक्ष पदी विशाल गायकर यांची तालुका संघटक पदी सुनील लहांगे व अतुल पवार यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रफुल्ल पवार, विनायक कांडेकर, विशाल गायकर, सचिन पवार, कुंदन ढिकले, अनिल पेखळे, ॲड नवनाथ कांडेकर,तेजश गायकवाड,संदेश टिळे, कुमार गायधनी, अतुल पवार,अक्षय अनवट,अभिषेक गायखे,शुभम जाधव, भास्कर मराडे, संदिप जाधव, महेश शेळके,शुभम थेटे, गोकुळ अनवट, अमित बोकड, धनाजी टोपले,पवण देशमुख, अविनाश फडोळ,आनंद ढेरींग,किरण वायकंडे, योगेश तिदमे, आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन तेजश देसले यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांनी मानले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...