Skip to main content

देव द्या, देवपण घ्या ! पाचव्या दिवशी ही गणेश मूर्तीदान स्वीकारले

नाशिक| प्रतिनिधी| प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांच्या मूर्तीपासून होणारे गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी गणेश मूर्ती दान करुन देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे.
On-the-fifth-day-give-Ganesha-idols-in-the-domestic-Ganeshotsav-Were-accepted-under-the-initiative
देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत पाच दिवसाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती स्विकारतांना ते बोलत होते. विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असून यंदाचे या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे.

पाचव्या दिवशी घरगुती गणेशोत्सवातील गणेश मुर्ती देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमांतर्गत विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्वीकारण्यात आल्या आहेत. याआधी दिड दिवसाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती देखील संकलित करण्यात आल्या आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवार दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे कार्यकर्ते मुर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व विविध सौंदर्यप्रसाधनांची मुतीचे गोदावरी नदीत विसर्जन केल्याने प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी देव द्या, देवपण घ्या ! हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत असल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली. या उपक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य मिळत आहे.

यावेळी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, कोमल कुरकुरे, सोनू जाधव, हृषिकेश आहेर, युवराज कुरकुरे, हर्षल देवरे, ऐश्वर्या अलोणे, अक्षय इंगळे, तन्वी हुंडेकर, सौरभ हेलोडे, प्रशांत मते, अनुश्री बागुल, सुनील गायकवाड, स्नेहा साखरे, सुयश शिंदे, साक्षी निकम, सुशीलकुमार शिंदे, दीक्षा पाटील, तन्वी मथुरे, युगंधर आठवले, भाग्यश्री पाटील, चैतन्य ढेंगळे, वैभव सांगळे, विकास फडत, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.



फोटो ओळी:- अकराव्या वर्षाच्या देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमांतर्गत पाच दिवसाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती आकाश पगार यांच्याकडे गणेश सुपुर्द करतांना गणेशभक्त. यावेळी विशाल गांगुर्डे, कोमल कुरकुरे, ऋषिकेश आहेर, सोनू जाधव, हर्षल देवरे, अक्षय इंगळे आदी दिसत आहेत.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...