Skip to main content

रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा: भुजबळ

नाशिक| काही दिवसांपासून हजारांच्या आत असलेली रुग्णसंख्या वाढत असल्याने या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
Speed-​​of-vaccination-should-be-increased-to-control-the-number-of-patients-Bhujbal
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, सुहास कांदे, नितीन पवार, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्यासाठी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिने लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात यावी. त्याचप्रमाणे दिवसाला एक लाख लसीकरण होण्याच्या दृष्टिने लसींची मागणी करून त्यानुसार नियोजन करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, त्याठिकाणी वीजेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर बसविण्यात यावेत. यासोबतच जेथे ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प तयार आहेत, त्या प्रकल्पांचे आमदारांनी उद्घाटन करुन प्रकल्पांचे लोकार्पण करावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

निफाड, येवला व सिन्नर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाच्या मदतीने ग्रामीण भागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. त्यादृष्टिने जिल्हा परिषदेला 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजातून 35 रुग्णवाहिकांना मंजूर करण्यात आल्या आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील अंतर लक्षात घेता तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिका बदलून नव्या रुग्णवाहिका मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. तसेच कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचे प्रलंबित वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याअगोदर नियमाप्रमाणे पुर्व सूचना देण्यात याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांना वीज बील अदा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...