Skip to main content

उत्तराखंड रुद्रप्रयाग येथे अडकलेल्या ३५ भाविकांना अखेर खा. गोडसेंच्या प्रयत्नामुळे मिळाले दर्शन

त्र्यंबकेश्वर| वार्ताहर| महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील ३५ भाविक चार धाम यात्रेसाठी गेले होते. त्यांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट आणि सींगल व्हॅक्सीन सर्टीफीकेट असून देखील त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले, अखेर राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्याशी एकाने संपर्क साधला त्यांनी तात्काळ नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांच्या कानावर ही बाब टाकल्यावर त्यांनी तात्काळ दिल्ली, उत्तराखंड येथे फोन करून संबंधित भाविकांचे दर्शन घडवून देण्यास सहकार्य करण्यास सांगितले आणि नाशिकच्या भाविकांना दर्शन घेण्याचे समाधान लाभले.
Finally-35-devotees-stranded-at-Rudraprayag-Uttarakhand-Darshan-got-due-to-mp-Godses-efforts
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या या भाविकांचे आरटीपीसीआर रिपोर्ट आणि सींगल व्हॅक्सीन सर्टीफीकेट असून देखील त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले व त्यांची पुन्हा बळजबरीने अँटिजेंन टेस्ट केली गेली त्यात ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले परंतु १ जणाची टेस्ट पॉजीटीव्ह आली, त्यानंतर त्या व्यक्तीची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. तरीदेखील त्यांना १४ दिवस कॉरंटाईन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाविकांना मोठा मानसिक त्रास झाला. यातून सुटका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कडलग यांना सचिन लोंढे यांचा फोन आला त्यांनी अडकलेल्या भाविकांशी संपर्क करुन दिला. त्यात गितांजली गाजरे (जाधव) या काँन्फरंन्स काँलवर त्यांचीशी बोलल्या त्या खुप अस्वस्थ होत्या, १०-१२ तासापासुन आम्ही खुप वैतागलो आहोत. आम्ही अनेक लोकांना फोन केले परंतु दादा प्लीज मदत कर अशी विनंती कडलग यांना करू लागल्या.

मग त्यांनी ताबडतोब या प्रकाराची खा. हेमंत आप्पा गोडसे यांना फोनवरून कल्पना दिली. खा. गोडसे यांनी मीटींगमध्ये असतांनाही तात्काळ दाखल घेत पांडे नावाच्या गृहस्थाशी बोलुन मदतीचे सर्व प्रयत्न केले. त्यांनी तेथील स्थानिक अधिकाऱ्यांपासून संसद भवन, महाराष्ट्र सरकार असे २०-२५ कॉल करत सहकार्य करण्यास सांगितले. आणि भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली. त्यानंतर कडलग यांना सचिनचा ४-५ तासानंतर कॉल आला की आपली सर्व टीम आता दर्शनाला गेली व सर्व जण त्र्यंबकराजाच्या कृपेने सुखरूप आहेत. त्यानंतर प्रीतम पवार, धर्मेंद्र उपाध्याय, निशा उपाध्याय, सचिन जाधव, गीतांजली गाजरे (जाधव), मोहिनी गाजरे, किरण धनक, सुनीता धनक, मुनीलाल कनोजिया, शकुंतला कानोजिया, कुसुम चितोडीया, अरुणा काळे, रतन गवळी, रंजना करांकळ, तुषार पाटील, नेहा पाटील, संध्या वानखेडे, ललिता खरे, आरोही वानखेडे, उमेश सांगळे, मीना शिंदे, गोपीनाथ उतेकर,  सुषमा हिंडलेकर, निहार बनसोडे, शशिकला बनसोडे, प्रदीप बनसोडे, सुनीता उतेकर, हेमा माखवा, नथु पाटील, आशा पाटील, त्रिंबक सावळे, दुर्गा सावळे, रंजना पाटील, स्नेहा या सर्व भाविकांनी खा. गोडसे यांचे आभार व्यक्त केले. तसेच पुरुषोत्तम कडलग यांनी ही महाविकास आघाडी घटक पक्षाचे खासदार यांनी कार्यतत्परतेने मदतीचे आश्वासन देऊन थेट पाठपुरावा केला व सर्वांची सुटका झाली त्यामुळे त्यांचे मनःपुर्वक आभार मानले आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...