Skip to main content

उत्तराखंड रुद्रप्रयाग येथे अडकलेल्या ३५ भाविकांना अखेर खा. गोडसेंच्या प्रयत्नामुळे मिळाले दर्शन

त्र्यंबकेश्वर| वार्ताहर| महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील ३५ भाविक चार धाम यात्रेसाठी गेले होते. त्यांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट आणि सींगल व्हॅक्सीन सर्टीफीकेट असून देखील त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले, अखेर राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्याशी एकाने संपर्क साधला त्यांनी तात्काळ नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांच्या कानावर ही बाब टाकल्यावर त्यांनी तात्काळ दिल्ली, उत्तराखंड येथे फोन करून संबंधित भाविकांचे दर्शन घडवून देण्यास सहकार्य करण्यास सांगितले आणि नाशिकच्या भाविकांना दर्शन घेण्याचे समाधान लाभले.
Finally-35-devotees-stranded-at-Rudraprayag-Uttarakhand-Darshan-got-due-to-mp-Godses-efforts
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या या भाविकांचे आरटीपीसीआर रिपोर्ट आणि सींगल व्हॅक्सीन सर्टीफीकेट असून देखील त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले व त्यांची पुन्हा बळजबरीने अँटिजेंन टेस्ट केली गेली त्यात ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले परंतु १ जणाची टेस्ट पॉजीटीव्ह आली, त्यानंतर त्या व्यक्तीची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. तरीदेखील त्यांना १४ दिवस कॉरंटाईन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाविकांना मोठा मानसिक त्रास झाला. यातून सुटका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कडलग यांना सचिन लोंढे यांचा फोन आला त्यांनी अडकलेल्या भाविकांशी संपर्क करुन दिला. त्यात गितांजली गाजरे (जाधव) या काँन्फरंन्स काँलवर त्यांचीशी बोलल्या त्या खुप अस्वस्थ होत्या, १०-१२ तासापासुन आम्ही खुप वैतागलो आहोत. आम्ही अनेक लोकांना फोन केले परंतु दादा प्लीज मदत कर अशी विनंती कडलग यांना करू लागल्या.

मग त्यांनी ताबडतोब या प्रकाराची खा. हेमंत आप्पा गोडसे यांना फोनवरून कल्पना दिली. खा. गोडसे यांनी मीटींगमध्ये असतांनाही तात्काळ दाखल घेत पांडे नावाच्या गृहस्थाशी बोलुन मदतीचे सर्व प्रयत्न केले. त्यांनी तेथील स्थानिक अधिकाऱ्यांपासून संसद भवन, महाराष्ट्र सरकार असे २०-२५ कॉल करत सहकार्य करण्यास सांगितले. आणि भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली. त्यानंतर कडलग यांना सचिनचा ४-५ तासानंतर कॉल आला की आपली सर्व टीम आता दर्शनाला गेली व सर्व जण त्र्यंबकराजाच्या कृपेने सुखरूप आहेत. त्यानंतर प्रीतम पवार, धर्मेंद्र उपाध्याय, निशा उपाध्याय, सचिन जाधव, गीतांजली गाजरे (जाधव), मोहिनी गाजरे, किरण धनक, सुनीता धनक, मुनीलाल कनोजिया, शकुंतला कानोजिया, कुसुम चितोडीया, अरुणा काळे, रतन गवळी, रंजना करांकळ, तुषार पाटील, नेहा पाटील, संध्या वानखेडे, ललिता खरे, आरोही वानखेडे, उमेश सांगळे, मीना शिंदे, गोपीनाथ उतेकर,  सुषमा हिंडलेकर, निहार बनसोडे, शशिकला बनसोडे, प्रदीप बनसोडे, सुनीता उतेकर, हेमा माखवा, नथु पाटील, आशा पाटील, त्रिंबक सावळे, दुर्गा सावळे, रंजना पाटील, स्नेहा या सर्व भाविकांनी खा. गोडसे यांचे आभार व्यक्त केले. तसेच पुरुषोत्तम कडलग यांनी ही महाविकास आघाडी घटक पक्षाचे खासदार यांनी कार्यतत्परतेने मदतीचे आश्वासन देऊन थेट पाठपुरावा केला व सर्वांची सुटका झाली त्यामुळे त्यांचे मनःपुर्वक आभार मानले आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...