Skip to main content

तपोवन-टाकळीमार्गे मनपाची बस सेवा सुरू; नागरिकांमध्ये समाधान

नाशिकरोड| प्रतिनिधी| नाशिक महानगरपालिका अंतर्गत नाशिक शहर बससेवा तपोवन-टाकळीमार्गे सुरू झाल्याने प्रभाग १६ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रभाग १६ मधील ज्येष्ठ नागरिक,  लोकप्रतिनिधींच्या हस्ते बसची पुजा करण्यात येऊन झेंडा दाखवून टाकळीमार्गे बससेवेला प्रारंभ झाला.
Satisfaction-among-the-citizens-with-the-commencement-of-municipal-bus-service-via-Tapovan-Takli
प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे यांनी आगरटाकळी ते रामदास स्वामी नगर थांब्यापर्यंत प्रवाशांसमवेत बस मध्ये प्रवास केला. याप्रसंगी सर्व  लोकप्रतिनिधींच्या हस्ते बस मधील चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला. मागील दिड वर्षांपासून कोविड १९ मुळे टाकळीमार्गे  बससेवेला खंड पडला होता. बससेवा सुरू होण्यासाठी परिसरारातील लोकप्रतिनिधी यांनी विशेष प्रयत्न केल्याने सर्व नागरिकांच्यावतीने नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा तडवी,  नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे यांचे विशेष आभार मानण्यात आले. याप्रसंगी युगांतर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), रफिक तडवी, अनिल जोंधळे, सुनील जोंधळे, जयेश सोनवणे, यशवंत साळवे, अलका निकाळे, मीरा मोरे, मीना पगारे, कविता पगारे, राजू जाधव, अजय केला, नंदू पगारे, प्रमोद गोसावी, राजू धनगर, सुनील साळवे, प्रशांत रावळ, भारत लोखंडे, अतुल औटे, अनिल पगारे, शिवाजी सूर्यवंशी, सुखदेव मेसमाळे, पप्पू पवार, विजय साळवे, कैलाश देवरे, गौरव केदारे आदी प्रभागातील नागरिक, महिला तथा सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाकळीमार्गे बसथांब्यासाठी विविध ठिकाणी स्टॉप, वेळापत्रक लवकरच येथे बसवण्यात येईल.

असा असेल मार्ग
---------------------------
पंचवटी निमाणी-तपोवन-टाकळी फाटा-जयशंकर गार्डन चौक-टाकळी गांव-रामदास स्वामी नगर-उपनगरमार्गे नाशिकरोड तसेच सी बी एस-द्वारका-टाकळीफाटा-जयशंकर गार्डन चौक-टाकळी गांव-रामदास स्वामी नगर-उपनगरमार्गे नाशिकरोड.

नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा

कोविड - १९ मुळे बससेवेला खंड पडला होता. परिणामी येथील नागरिकांना फारच गैरसोय सहन करावी लागली. परंतु महापालिकेने आता ही अडचण सोडवली असून बससेवेला प्रारंभ झाला. शाळा-महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथील शाळकरी मुले-मुली, महाविद्यालयीन युवकांना या बससेवेचा लाभ होईल. नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.

सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका, प्रभाग क्र १६.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...