Skip to main content

सोन्याची चमक आणखी वाढणार, सणासुदीसह लग्नसराईच्या खरेदीला मिळणार पसंती

नाशिक| लसीकरणावर भर दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून सराफबाजार ही आता पूर्वपदावर येत आहे. आगामी दिवाळी, पडवा आणि लग्नसराईच्या दृष्टीने सोन्याची चमक आणखी वाढण्याची शक्यता असून भावात साधारण दोन ते अडीच हजारांनी वाढ होण्याची शक्यता सराफी व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या सोने भाव २४ कॅरेटला ४९८०० इतका आहे. त्यामुळे सोने खरेदीला ही चांगली संधी मानली जात आहे.
The-luster-of-gold-will-be-further-enhanced-with-the-preference-for-wedding-shopping-with-festival
आरोग्य यंत्रणेने लसीकरणावर भर दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून निर्बंध हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या वातावरणामुळे बाजारपेठा गजबजू लागल्या आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल ठप्प होती. ती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सराफ बाजारात आगामी दिवाळी आणि लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले सरफाबाजारकडे वळत असून गेल्या वर्षी मार्च २०२० ला सोन्याने ५६,२०० रुपये १ तोळा इतका उच्चांकी भाव गाठला होता. लोकांना खरेदीची इच्छा असली तरी निर्बंधांमुळे शक्य होत नव्हते. त्यामुळे व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून आला. 

गत वर्षीच्या तुलनेत ५ ते ७ सात हजारापर्यंत सोने भाव उतरला आहे. आज(दि. २६) रोजी सोने २४ कॅरेटला जीएसटीसह ४९,८००/ रुपये इतका भाव आहे. मागील वर्षी पाडव्याला ५१,५००/ तर चांदी किलोला ६४५०० भाव होता. आता दिवाळी, पाडवा आणि त्यानंतरची लग्नसराई यामुळे सोने दरात दोन ते अडीच हजाराची वाढ होण्याची शक्यता आहे, असे असले तरी सोने खरेदीला ग्राहकांची पसंती कायम आहे. 


यंदा सोने खरेदीसाठी ग्राहकांना चांगली संधी: गिरीश नवसे

गेल्या १५ ते २० दिवसात दोन ते अडीच हजार रुपयांनी दर वाढला आहे, असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत ग्राहकांना सोने खरेदीची ही चांगली संधी आहे. सणासुदीनंतर येणाऱ्या लग्नसराईसाठी ग्राहक याच कालावधीत सोने खरेदी करत असतात त्यांच्यासाठी हा चांगला योग आहे. पुढील कालावधीत आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे.

गिरीश नवसे अध्यक्ष, दि नाशिक सराफ असोसएशन



सोने खरेदीकडे गुंतवणुकदारांचा कल: चेतन राजापुरकर

जागतिक तज्ज्ञांनी वाढीची शक्यता व्यक्त केली असून  पुढील दरवाढ लक्षात घेऊन गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल दिसून येत आहे. निर्बंध शिथिल झाल्याने पुढील येणाऱ्या सण, उत्सव आणि लग्नसराईसाठी ग्राहकांना मुक्तपणे खरेदीचा आनंद घेता येणार आहे.

                       चेतन राजापुरकर
संचालक, महाराष्ट्र स्टेट बोर्ड (आयबीजे)

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...