Skip to main content

सोन्याची चमक आणखी वाढणार, सणासुदीसह लग्नसराईच्या खरेदीला मिळणार पसंती

नाशिक| लसीकरणावर भर दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून सराफबाजार ही आता पूर्वपदावर येत आहे. आगामी दिवाळी, पडवा आणि लग्नसराईच्या दृष्टीने सोन्याची चमक आणखी वाढण्याची शक्यता असून भावात साधारण दोन ते अडीच हजारांनी वाढ होण्याची शक्यता सराफी व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या सोने भाव २४ कॅरेटला ४९८०० इतका आहे. त्यामुळे सोने खरेदीला ही चांगली संधी मानली जात आहे.
The-luster-of-gold-will-be-further-enhanced-with-the-preference-for-wedding-shopping-with-festival
आरोग्य यंत्रणेने लसीकरणावर भर दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून निर्बंध हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या वातावरणामुळे बाजारपेठा गजबजू लागल्या आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल ठप्प होती. ती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सराफ बाजारात आगामी दिवाळी आणि लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले सरफाबाजारकडे वळत असून गेल्या वर्षी मार्च २०२० ला सोन्याने ५६,२०० रुपये १ तोळा इतका उच्चांकी भाव गाठला होता. लोकांना खरेदीची इच्छा असली तरी निर्बंधांमुळे शक्य होत नव्हते. त्यामुळे व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून आला. 

गत वर्षीच्या तुलनेत ५ ते ७ सात हजारापर्यंत सोने भाव उतरला आहे. आज(दि. २६) रोजी सोने २४ कॅरेटला जीएसटीसह ४९,८००/ रुपये इतका भाव आहे. मागील वर्षी पाडव्याला ५१,५००/ तर चांदी किलोला ६४५०० भाव होता. आता दिवाळी, पाडवा आणि त्यानंतरची लग्नसराई यामुळे सोने दरात दोन ते अडीच हजाराची वाढ होण्याची शक्यता आहे, असे असले तरी सोने खरेदीला ग्राहकांची पसंती कायम आहे. 


यंदा सोने खरेदीसाठी ग्राहकांना चांगली संधी: गिरीश नवसे

गेल्या १५ ते २० दिवसात दोन ते अडीच हजार रुपयांनी दर वाढला आहे, असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत ग्राहकांना सोने खरेदीची ही चांगली संधी आहे. सणासुदीनंतर येणाऱ्या लग्नसराईसाठी ग्राहक याच कालावधीत सोने खरेदी करत असतात त्यांच्यासाठी हा चांगला योग आहे. पुढील कालावधीत आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे.

गिरीश नवसे अध्यक्ष, दि नाशिक सराफ असोसएशन



सोने खरेदीकडे गुंतवणुकदारांचा कल: चेतन राजापुरकर

जागतिक तज्ज्ञांनी वाढीची शक्यता व्यक्त केली असून  पुढील दरवाढ लक्षात घेऊन गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल दिसून येत आहे. निर्बंध शिथिल झाल्याने पुढील येणाऱ्या सण, उत्सव आणि लग्नसराईसाठी ग्राहकांना मुक्तपणे खरेदीचा आनंद घेता येणार आहे.

                       चेतन राजापुरकर
संचालक, महाराष्ट्र स्टेट बोर्ड (आयबीजे)

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...