Skip to main content

प्रत्येक गावात एक डिजिटल अंगणवाडी होणे ही काळाची गरज: रामदास चारोस्कार

दिंडोरी| बालवयातच बालकांना सुसंस्कारीत केले व त्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून बालपणापासून शाळेत येण्याची गोडी निर्माण केल्यास उद्याची सुसंस्कारीत पिढी त्यातून निर्माण होईल, तसेच प्रत्येक गावात डिजिटल अंगणवाडी  होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मा. आ. रामदास चारोस्कर यांनी काल येथे केले.  
A-digital-Anganwadi-in-every-village-is-the-need-of-the-hour-Ramdas-Charoskar

नाशिक पंचवटी येथील श्री गजानन महाराज पतसंस्था विद्यमाने संस्थेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रम निधीतून केलेल्या डिजिटल अंगणवाडी उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बालकाचा बौद्धिक पाया ज्या वयापासून सुरु होतो त्याच वयात त्यांच्या सर्वागीण बौद्धिक व शैक्षणिक विकास होण्यासाठी बालवयातच अशा अंगणवाडीची नितांत गरज असते.अशा या शैक्षणिक कार्याची सुरुवात श्री गजानन महाराज पतसंस्थेने केली हे भूषणावह आहे.
याप्रसंगी डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटक नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्थचे अध्यक्ष श्री नारायण शेठ वाजे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका डॉ. सौ अंजलीताई पाटील, उपाध्यक्ष के के चव्हाण,  नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या जनसंपर्क संचालिका अश्विनीताई बोरस्ते, दि विजय अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी नाशिकचे चेअरमन राकेश चव्हाण, नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सीईओ श्री सोपानराव थोरात, जऊळके दिंडोरीचे वृक्षमित्र व सरपंच तुकाराम जोंधळे, अक्राळे जय योगेश्वर ग्रा. बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन जी एम गायकवाड, सह्याद्री फॉर्मचे संचालक विलास शिंदे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे नंदूदादा सोमवंशी, मा पंचायत समिती सदस्य श्री शामराव बोडके, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस श्री भास्करराव भगरे सर, शिवसेना तालुका प्रमुख दिंडोरी श्री. पांडूरंग गणोरे, दिंडोरी गटविकास अधिकारी डॉ श्री निलेश पाटील, सरपंच सौ अर्चना डगळे, उपसरपंच संदीप केंदळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी उद्घाटक श्री नारायण वाजे यांनी श्री गजानन पतसंस्थेने बालकांसाठी केलेल्या अंगणवाडी सुविधांचे कौतुक केले. अशाच प्रकारचे उपक्रम इतरही पतसंस्थामार्फत नाशिक जिल्ह्यात सुद्धा राबविण्याचे सूतोवाच त्यांनी केले. या प्रसंगी केलेल्या भाषणात अनेक वक्त्यांनी संस्थने जो आदर्श निर्माण केलेला आहे याचे मनापासून कौतुक करून श्री गजानन महाराज पतसंस्था, अक्राळे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले. डॉ सौ अश्विनी ताई बोरस्ते, डॉ सौ अंजली पाटील, डॉ निलेश पाटील, नंदू सोमवंशी, श्री पांडुरंग गणोरे, श्री संदीप केंदळे आदींनी केलेल्या मनोगतात संस्थेचे अभिनंदन केले. अंगणवाडीच्या वर्गात शिशु बालकांना सहज समजतील अशी चित्ररूपाने बाराखडी, व प्राण्यांची चित्रे रंगविण्यात आली होती. प्रांगणात झोके, खेळणी व लौन्स याची उभारणी करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच गावातील सर्व झाडे पांढरे  व गेरू रंगाने उजळविण्यात आले होते. 
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री बापूसाहेब गायकवाड यांनी संस्था सामाजिक उपक्रम निधीमधून करित असलेल्या विद्यार्थी दत्तक योजना, मयत सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत, श्री गजानन साक्षी सोने खरेदी योजना यांची माहिती देऊन संस्था करीत असलेल्या गृहनिर्माण, वाहन, हफ्तेबंद, अल्पबचत, मुदत ठेवी, सोने तारण ईत्यादी कर्जांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच यापूर्वीही मोहाडी व अक्राळे येथील शाळांना शालेय शैक्षणिक साहित्य पुरविल्याचे त्यांनी विषद केले.

भविष्य काळात विविध शैक्षणिक कार्यात सदैव मदतीचा हात तुमच्या पाठीशी  राहील असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रविंद्र गायकवाड संचालक व आभार प्रदर्शन व्यवस्थापिका सौ मृणाली कर्णिक यांनी केले. सोहळयाचे खुमासदार संचलन श्री सुभाष मामा बिडवई, अंतर्गत लेखापरीक्षक यांनी केले. 
कार्यक्रमास राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व इतर क्षेत्रातील मान्यवर तसेच पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, श्री गजानन महाराज पतसंस्थाचे सर्व संचालक व कर्मचारी, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, व रहिवासी आणि अक्राळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थितीत  होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री बापूसाहेब गायकवाड, श्री आत्माराम मुरकुटे, श्री रविंद्र गायकवाड, सौ मृणाली कर्णिक व कर्मचारी, सौ करुणा पांडव अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस, श्री संदीप केंदळे, श्री अनिल गायकवाड व इतरांनी परिश्रमपूर्वक केले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...