Skip to main content

राज्य कृषिसेवा महासंघाच्या अध्यक्षपदी कैलास मोते. सरचिटणीसपदी अभिजित जमधडे यांची निवड

नाशिक| शासनाच्या कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची संघटना असलेल्या राज्य कृषिसेवा महासंघांच्या पुनर्गठनासाठी सोमवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत महासंघाच्या अध्यक्षपदी कृषी संचालक कैलास मोते तर सरचिटणीसपदी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
Kailas-Mote-as-the-President-of-the-State-Agricultural-Service-Federation-of-selection-and-Abhijit-Jamhadhe-as-General-Secretary
तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी विभागातील सर्व वर्गांतील संघटनांचा मिळून एकसंघ अशा महासंघाची पुनर्बांधणी करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष-संदीप केवटे, कार्याध्यक्ष- बालाजी ताटे, संजय पाटील व जितेंद्र पानपाटील, राज्य उपाध्यक्ष- विक्रांत परमार, प्रीती हिराळकर, बंडा कुंभार, शिवाजी राठोड, झाकीर हुसेन मुलाणी यांची ही निवड करण्यात आली.

कृषी सेवा महासंघ कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या खालील एकसमान प्रश्नावर काम करणार आहे. 

1)आकृतीबंध- कृषी विभागाचा आकृतीबंध महसूल,ग्रामविकास,जलसंपदा या विभागाच्या धर्तीवर बळकट करतानाच, पदोन्नतीच्या संधी देणारा व कार्यालये बळकटीकरण करणारा  करतानाच,समय मर्यादित पणे मान्य होण्यासाठी कार्य करणे. 2.)समकक्षता- केंद्रीय कृषी मंत्रालयाने सन 2017 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कृषी विभागाची समकक्षता राज्यातील इतर तांत्रिक विभागा बरोबर प्रस्थापित करणे. 3.)आस्थापना- अधिकारी/कर्मचारी यांचे आस्थापना विषयक प्रश्न सामोपचाराने मार्गी लावणे. 4.)पदोन्नती- कृषी विभागातील रखडलेल्या पदोन्नती जलदगतीने मार्गी लावणे. आदीं प्रश्नांवर भर राहणार आहे. 

या बैठकीला कृषी विभागातील तांत्रिक तसेच अतांत्रिक अधिकारी/कर्मचारी यांच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,तसेच कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (विस्तार) श्री.विकास पाटील सा. व विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गातील अति वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते अशी माहितीमहाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघाचे सरचिटणीस अभिजित जमधडे यांनी दिली आहे.

 

 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...