Skip to main content

त्र्यंबकेश्वर येथे रेशनिंग दुकानदारांची आढावा बैठक; विविध प्रश्नांवर उहापोह

त्र्यंबकेश्वर| रेशनिंग दुकानदारांचे विविध प्रश्न  सोडवण्याच्या दृष्टीने  त्र्यंबकेश्वर येथील श्री चंद्र गार्डन लॉन्स येथे फेडरेशनची आढावा बैठक झाली. या बैठकीत राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील व जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, खजिनदार ढवळू फसाळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 
Review-meeting-of-rationing-shopkeepers-at-Trimbak
यावेळी बैठकीला सर्व तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित होते. बैठकीत दुकानदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच त्र्यंबकेश्वरचे पुरवठा नाय तहसीलदार यांची भेट घेऊन दुकानदारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात दुकानदारांचे दोन थम त्यांच्या कुटुंबातले ठेवावे अशी मागणी करण्यात आली आणि कमिशन बाबत चर्चा झाली. शासनाला अहवाल पाठवू असे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले.

यावेळी निफाड तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे अध्यक्ष, वाल्मीक लांडगोळे, गणपत नेवगे सेक्रेटरी, नारायण ठुबे 2) इगतपुरी तालुका अरुण बागडे उपाध्यक्ष, गुलाब वाजे, सीमा जाधव, अपर्णा पाटील 3)पेठ तालुका धर्मराज चौधरी अध्यक्ष, दिलीप भोये, प्रकाश शेवरे, 4) सुरगाणा तालुका ऐवाजी भोई अध्यक्ष, हरी महाले सेक्रेटरी, भास्कर चौधरी उपाध्यक्ष, मिथुन चौधरी 5) बागलाण तालुका प्रवीण सावंत अध्यक्ष, रमेश मुळे सेक्रेटरी, गुलाब जैन, किरण खैरनार, विजय घुगे 6) सिन्नर तालुका सतीश भुतडा अध्यक्ष, चंद्रकांत माळी माजी अध्यक्ष, दीपक जगताप पदाधिकारी  7) देवळा तालुका - देवा गांगुर्डे अध्यक्ष, चेतन गुंजाळ, योगेश गुंजाळ, सोमनाथ सावकार, केदा आहेर सर्वांच्या समवेत व त्रंबक तालुक्याच्या सर्व दुकानदारांच्या समवेत एकमताने कमिटीची निवड करण्यात आली. त्रंबक तालुका कमिटी लालू आचारी अध्यक्ष, राम कजबे उपाध्यक्ष, हेमंत तरवाडे सचिव, ज्ञानेश्वर मेढे उपसचिव, किसन वारघडे कार्याध्यक्ष, युवराज चव्हाण खजिनदार, गणपत जाधव संपर्कप्रमुख आदीं उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...