Skip to main content

ग्रंथ वाचनाने व्यक्तीमत्व समृध्द होण्यास मदत होते: डॉ. राजेंद्र बंगाळ

नाशिक|नियमित ग्रंथ वाचनाने व्यक्तीमत्व समृध्द होते तसेच सकारात्मक विचार वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ समवेत परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही.कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Reading-books-helps-to-enrich-personality-Registrar-Dr-Rajendra-Bangal
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी अध्यक्षस्थानावरुन सांगितले की, मराठी भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. सर्वांनी सतत विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तक वाचनातून साहित्याची आवड निर्माण होते. भाषा समृध्द होण्यासाठी त्यास बळकटी मिळते. समृध्द भाषेने व्यक्तीमत्व सकस होते. भाषा समृध्द होण्यासाठी मराठी साहित्याचे नियमित वाचन होणे गरजेचे आहे. भाषा संवर्धनासाठी मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, मराठी भाषा अभिजात भाषा असून ती अमृताशी पैंजा जिंकेल असे यथार्थ वर्णण संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. तीच मराठी माझी मातृभाषा आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेतील ग्रंथ, साहित्यसंपदा विपूल असून मराठीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. सध्याच्या संगणक व मोबाईलच्या आभासी जगात वावराणारी तरुण व बाल अवस्थेतील पिढीने पुस्तकांचे वाचन केले पहिजे. पुस्तक वाचनातून व्यक्तीमत्वाला पैलू पडतात. लेखकांनी मांडलेले विचार व माहिती आपणांस मार्गदर्शक ठरते असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी श्री. नरहरी कळसकर यांनी सांगितले की, प्रत्येकाला वाचनाची सवय असावी. मराठी साहित्यात कथा, कादंबरी, कविता, विनोदी लेखन अशा अनेक प्रकारचे पुस्तके उपलब्ध आहेत. वाचना संस्कृतीची जोपासना सर्वांनी करावी. भेटवस्तू ऐवजी पुस्तक देण्यात यावे जेणेकरुन पुस्तकाच्या माध्यमातून वाचनाला चालना मिळेल. विद्यार्थी जीवनात वाचलेली पुस्तके आयुष्यभर प्रेरणादायी ठरतात असे त्यांनी सांगितले.

 ’जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठाचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखाधिकारी यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी गीतगायन, नाटयप्रवेश, कविता वाचन सादर केले. विद्यापीठातील अधिकारी डॉ. संजय नेरकर, श्री. प्रकाश पाटील, डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. रविंद्र रांधव, श्री. एस.एस. मुलानी, श्रीमती चेतना पवार, श्री. शैलेंद्र जमधाडे, श्रीमती मीना अग्नीहोत्री यांनी पुस्तकाचे अभिवाचन, कविता, गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...