Skip to main content

साहित्यकणा फाऊंडेशनचे संमेलन ऊत्साहात; वरिष्ठ पत्रकार ब्रिजकुमार परिहार यांचा वृत्तसेवारत्न पुरस्काराने गौरव

नाशिक| येथील साहित्यकणा फाऊंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन श्री. सबनिस यांच्या हस्ते झाले. युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्‍वर्य पाटेकर संमेलनाध्यक्ष होते. पं. अविराज तायडे, यशवंत पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई व्यासपीठावर होते. 
श्री. सबनिस म्हणाले की, संयोजक म्हणून मंचावर बसणारे, मिरवणारे अनेकजण असतात. परंतु, साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष व सचिव हे दोन खंदे पदाधिकारी ज्या तळमळीने संमेलनासाठी राबत आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अध्यक्षिय भाषणात श्री. पाटेकर म्हणाले की, अखिल भारतीय साहित्य संमेलनांत फक्त गर्दी होते. तेथे तळमळ दिसत नाही. अशा छोटेखानी संमेलनांतूनच साहित्यिक घडत असतात. साहित्यावर आतापर्यंत खुप बोललं गेलं, लिहिलं गेलं. पण, अशा माणसांवर बोललं पाहिजे. सुरवातीला प्रणव पाटणकर, विलास पाटणकर आदींनी स्वागतगीत सादर केले. सुरेखा बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. 

दरम्यान, उद्‌घाटन सत्रानंतर रावसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय साहित्यकणा काव्य स्पर्धेत तब्बल ७० कवींनी सहभाग घेतला. त्यात धुळे, औरंगाबाद, अमरावती, रत्नागिरी, अकोले, संगमनेर, सोलापूर लातूर, जालना, जळगाव, पुणे, पालघर, बीड आदी जिल्ह्यांतील कविंनी आपल्या कविता सादर केल्या. त्यांना कविता सादर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आशा गोवर्धने व प्रणाली पंचभाई यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी अनंत वाणी यांच्या ‘आनंददायी युरोप दर्शन’ या प्रवास वर्णनाचे व कवयित्री रजनी अनंत वाणी यांच्या ‘भावना अंतरीच्या’ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रा. आशा पाटील व वैजयंती सिन्नरकर यांनी परीक्षण केले. 

दरम्यान, दुपारच्या सत्रात ‘आजचे साहित्य मूल्यहीन झाले आहे का..?’ या विषयावर झालेल्या परिसंवादात प्रा. दिलीप पवार, प्रा. प्रतिभा जाधव व प्रविण जोंधळे यांनी सहभाग घेतला. प्रा. राज शेळके यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण निवेदन केले. आजचे साहित्य मूल्यहीन झालेले नाही, मात्र पालकांनी आगामी पिढीला वाचनाचा वारसा देण्याची गरज असल्याचा सूर या परिसंवादातून व्यक्त झाला. यानंतर झालेल्या समारोपिय संत्रात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विश्‍वास बँकेचे अध्यक्ष विश्‍वास ठाकूर या वेळी अध्यक्षस्थानी होते. 
-- 
यांचा झाला सत्कार 
वाङ्‌मय पुरस्कार (कंसात पुस्तकाचे नाव) 
* सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार- मनीषा पाटील हरोलीकर, सांगली (नाती वांझ होतांना) व तन्वी अमित, नाशिक (आवर्ती अपूर्णांक) 
* मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार- प्रा. यशवंत माळी, सांगली (उलाघाल) व पुष्पा चोपडे, नाशिक (मन न्यारं रे तंतर) 
* शिलाताई गहिलोत-राजपूत कादंबरी पुरस्कार- नीरजा, मुंबई (थिजलेल्या काळाचे अवशेष) 
* राहुल पाटील स्मृती बालसाहित्य पुरस्कार प्रा. डॉ. सुनील विभूते (सुरस धातू गाथा). 
----- 
नाशिक रत्न पुरस्कार 
* ज्ञानरत्न पुरस्कार : प्रकाश कोल्हे (मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्था) 
* साहित्यरत्न पुरस्कार : रविंद्र मालुंजकर (प्रसिद्ध साहित्यिक व सूत्रसंचालक) 
* वृत्तसेवारत्न पुरस्कार : ब्रिजकुमार परिहार (वरिष्ठ उपसंपादक, सकाळ) 
* समाजरत्न पुरस्कार : बापू कोतवाल (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) 
* दिव्यांगरत्न पुरस्कार : सागर बोडके (गिर्यारोहक व सायकलपटू) 
--- 
काव्यस्पर्धेचा निकाल 
* प्रथम : ऐश्‍वर्या नेहे (चप्पल) 
* द्वितीय : आर. पी. शिखरे (वार वारंवार) 
* तृतिय : सौरभ आहेर (बाई दुबळी असते) 
* चतुर्थ : रेखा सोनटक्के(आदिवासी) व समृद्धी बनकर 
* पाचवा क्रमांक : प्रणाली पंचभाई (कवटी) व देव थोरात (चूल) 
* विशेष उल्लेखनिय : श्रेया नावरकर 
----------

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...