Skip to main content

साहित्यकणा फाऊंडेशनचे संमेलन ऊत्साहात; वरिष्ठ पत्रकार ब्रिजकुमार परिहार यांचा वृत्तसेवारत्न पुरस्काराने गौरव

नाशिक| येथील साहित्यकणा फाऊंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन श्री. सबनिस यांच्या हस्ते झाले. युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्‍वर्य पाटेकर संमेलनाध्यक्ष होते. पं. अविराज तायडे, यशवंत पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई व्यासपीठावर होते. 
श्री. सबनिस म्हणाले की, संयोजक म्हणून मंचावर बसणारे, मिरवणारे अनेकजण असतात. परंतु, साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष व सचिव हे दोन खंदे पदाधिकारी ज्या तळमळीने संमेलनासाठी राबत आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अध्यक्षिय भाषणात श्री. पाटेकर म्हणाले की, अखिल भारतीय साहित्य संमेलनांत फक्त गर्दी होते. तेथे तळमळ दिसत नाही. अशा छोटेखानी संमेलनांतूनच साहित्यिक घडत असतात. साहित्यावर आतापर्यंत खुप बोललं गेलं, लिहिलं गेलं. पण, अशा माणसांवर बोललं पाहिजे. सुरवातीला प्रणव पाटणकर, विलास पाटणकर आदींनी स्वागतगीत सादर केले. सुरेखा बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. 

दरम्यान, उद्‌घाटन सत्रानंतर रावसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय साहित्यकणा काव्य स्पर्धेत तब्बल ७० कवींनी सहभाग घेतला. त्यात धुळे, औरंगाबाद, अमरावती, रत्नागिरी, अकोले, संगमनेर, सोलापूर लातूर, जालना, जळगाव, पुणे, पालघर, बीड आदी जिल्ह्यांतील कविंनी आपल्या कविता सादर केल्या. त्यांना कविता सादर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आशा गोवर्धने व प्रणाली पंचभाई यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी अनंत वाणी यांच्या ‘आनंददायी युरोप दर्शन’ या प्रवास वर्णनाचे व कवयित्री रजनी अनंत वाणी यांच्या ‘भावना अंतरीच्या’ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रा. आशा पाटील व वैजयंती सिन्नरकर यांनी परीक्षण केले. 

दरम्यान, दुपारच्या सत्रात ‘आजचे साहित्य मूल्यहीन झाले आहे का..?’ या विषयावर झालेल्या परिसंवादात प्रा. दिलीप पवार, प्रा. प्रतिभा जाधव व प्रविण जोंधळे यांनी सहभाग घेतला. प्रा. राज शेळके यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण निवेदन केले. आजचे साहित्य मूल्यहीन झालेले नाही, मात्र पालकांनी आगामी पिढीला वाचनाचा वारसा देण्याची गरज असल्याचा सूर या परिसंवादातून व्यक्त झाला. यानंतर झालेल्या समारोपिय संत्रात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विश्‍वास बँकेचे अध्यक्ष विश्‍वास ठाकूर या वेळी अध्यक्षस्थानी होते. 
-- 
यांचा झाला सत्कार 
वाङ्‌मय पुरस्कार (कंसात पुस्तकाचे नाव) 
* सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार- मनीषा पाटील हरोलीकर, सांगली (नाती वांझ होतांना) व तन्वी अमित, नाशिक (आवर्ती अपूर्णांक) 
* मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार- प्रा. यशवंत माळी, सांगली (उलाघाल) व पुष्पा चोपडे, नाशिक (मन न्यारं रे तंतर) 
* शिलाताई गहिलोत-राजपूत कादंबरी पुरस्कार- नीरजा, मुंबई (थिजलेल्या काळाचे अवशेष) 
* राहुल पाटील स्मृती बालसाहित्य पुरस्कार प्रा. डॉ. सुनील विभूते (सुरस धातू गाथा). 
----- 
नाशिक रत्न पुरस्कार 
* ज्ञानरत्न पुरस्कार : प्रकाश कोल्हे (मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्था) 
* साहित्यरत्न पुरस्कार : रविंद्र मालुंजकर (प्रसिद्ध साहित्यिक व सूत्रसंचालक) 
* वृत्तसेवारत्न पुरस्कार : ब्रिजकुमार परिहार (वरिष्ठ उपसंपादक, सकाळ) 
* समाजरत्न पुरस्कार : बापू कोतवाल (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) 
* दिव्यांगरत्न पुरस्कार : सागर बोडके (गिर्यारोहक व सायकलपटू) 
--- 
काव्यस्पर्धेचा निकाल 
* प्रथम : ऐश्‍वर्या नेहे (चप्पल) 
* द्वितीय : आर. पी. शिखरे (वार वारंवार) 
* तृतिय : सौरभ आहेर (बाई दुबळी असते) 
* चतुर्थ : रेखा सोनटक्के(आदिवासी) व समृद्धी बनकर 
* पाचवा क्रमांक : प्रणाली पंचभाई (कवटी) व देव थोरात (चूल) 
* विशेष उल्लेखनिय : श्रेया नावरकर 
----------

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...