Skip to main content

स्व.गोपीनाथ मुंडे दलित, वंचित, ओबीसींसाठी समर्पित भावनेने काम करणारे योद्धे: नितीन गडकरी

नाशिक|स्व. गोपीनाथजी मुंडे आमचे मार्गदर्शक होते. पक्षासाठी त्यांचे योगदान सर्वपरिचित आहे. महाराष्ट्रात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दलित, वंचित यांना भारतीय जनता पक्षात आणण्याचे श्रेय सर्वतोपरी गोपीनाथ मुंडे यांना जाते. कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठी जीवाची बाजी लावणारे असे व्यक्तिमत्व होते‌.  महाराष्ट्रातील दलित, वंचित, शोषित-पिडीत, आदिवासी, ओबीसी यांच्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे योद्धे होते, असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
Gopinath-Munde-a-dedicated-warrior-for-Dalits-obcsunderprivileged-Nitin Gadkari
नाशिक जिल्ह्यातील नांदूर-शिंगोटे, येथे उभारण्यात आलेल्या स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाचे  व पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, राज्याचे मंत्री श्री दादा भुसे, श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे जी, खासदार प्रीतम मुंडे, खा. हेमंत गोडसे, ॲड.माणिकराव कोकाटे, आ. हिरामण खोसकर, आ. देवयानी फरांदे, आ.नरेंद्र दराडे, मा. आमदार राजाभाऊ वाजे, माजी आ. डॉ.सुधीर तांबे, ॲड.हेमंत धात्रक, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, कार्यक्रमाचे आयोजक उदय सांगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

स्व गोपीनाथ मुंडे लोकनेते बिरुदाचे मुकुटमणी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

राज्यात अनेक लोकनेते झाले त्यांनी चांगले कार्य केले पण गोपीनाथ मुंडे हे लोकनेते बिरुदाचे मुकुटमणी होते असे गौरवद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ते पुढे म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे परखड बोलत व सामन्यासाठी आवाज उठवत होते, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. ७० चा दशकात फिरण्यासाठी वाहनं नव्हती तेव्हा त्यांनी सायकलवर फिरून पक्ष गावोगावी पोहचवला याचे श्रेय मुंडे यांना जाते असे सांगितले.

ओबीसी, वंचित घटकांसाठीचे त्यांचे कार्य शेवटच्या श्वासार्यंत सुरू ठेवू: भुजबळ

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाचे  व पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यभरातून मुंडे यांच्यावर प्रेम करणारी सामन्यजनता, कार्यकर्ते विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत कल्पक आणि सुंदर अशा स्मारक निर्मितीसाठी अनेकांनी परिश्रम घेतले त्यात स्मारक समितीचे आयोजक उदय सांगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. 




Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...