Skip to main content

माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे: डॉ.अर्पणा हेगडे

नाशिक|दिअँकर नेटवर्क| सशक्त व सुदृढ समाजासाठी महिलांचे व बालकांच्या आरोग्याची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काळजी व उपचार घेणे गरजेचे असून  माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ.अर्पणा हेगडे यांनी केले.
Health-of-women-and-children-must-be-taken-care-of-Dr-Aparna-Hegde
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानमाला उपक्रमात ’टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोर मॅटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ इन इंडिया’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याखानमालेत अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, सवमेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, प्रमुख वक्त्या मूत्ररोगशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. अपर्णा हेगडे, अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा आदी अधिकारी उपस्थित होते. 


’अरमान’ संस्थेच्या संस्थापिका तथा मुंबई येथील कामा रुग्णालयातील मूत्ररोगशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. अपर्णा हेगडे यांनी ’टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोर मेटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ इन इंडिया’ विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजातील महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. माता आणि बालमृत्यू, बालकांमधील आजार कमी करण्यासाठी समाजात प्रबोधन होणे आवश्यक आहे. गरोदर महिला आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य सेवकांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे जेणेकरुन योग्य आरोग्य सेवा पुरवणे शक्य होईल. 
राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातदेखील आरोग्य सेवेचे काम होणे आवश्यक आहे यासाठी स्थानिक बोलीभाषेचे ज्ञान असलेले आरोग्यसेवकांची मदत घेण्यात यावी. महिलांचे आरोग्य व स्वास्थ्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मोठया प्रमाणात कार्य करणे गरजेचे आहे. महिलांना स्वच्छतागृह व शुध्द पेजजल सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्नशील रहावे.  महिला व बालकांमधील आजाराची मुख्य कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी समाजात आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे. कुटुंबातील महिलांना सकस आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर  त्यांचे स्वास्थ्य अवलंबून आहे. प्रत्येकाने कुटुंबातील महिला व बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक   असल्याचे सांगितले.

  
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, महिला आणि बालक  समाजातील महत्वाचा घटक आहे, त्यांचे आरोग्य आणि उपचाराबाबत सजग राहणे आवश्यक आहे.   मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून ’ब्लॉसम’ उपक्रमाच्या माध्यमातून दूर्गम भागातील लोकांच्या आरोग्यासंदर्भात स्वयंसेवकांच्या मदतीने कार्य सुरु आहे. 
          
विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ’टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोर मॅटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ इन इंडिया’ विषयावर डॉ. अर्पणा हेगडे यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण ठरेले असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले.  विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेसाठी विद्यापीठ संशोधन विभागाचे प्राध्यापक  ब्रिगे. डॉ. सौरव सेन, डॉ. वैशाली गंभीरे, डॉ. प्रदीप आवळे यांनी काम पहिले.  या व्याख्यानमालेस महाराष्ट्र पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक व विद्यापीठातील अधिकारी मोठया संख्येने  उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...