Skip to main content

माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे: डॉ.अर्पणा हेगडे

नाशिक|दिअँकर नेटवर्क| सशक्त व सुदृढ समाजासाठी महिलांचे व बालकांच्या आरोग्याची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काळजी व उपचार घेणे गरजेचे असून  माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ.अर्पणा हेगडे यांनी केले.
Health-of-women-and-children-must-be-taken-care-of-Dr-Aparna-Hegde
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानमाला उपक्रमात ’टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोर मॅटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ इन इंडिया’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याखानमालेत अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, सवमेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, प्रमुख वक्त्या मूत्ररोगशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. अपर्णा हेगडे, अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा आदी अधिकारी उपस्थित होते. 


’अरमान’ संस्थेच्या संस्थापिका तथा मुंबई येथील कामा रुग्णालयातील मूत्ररोगशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. अपर्णा हेगडे यांनी ’टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोर मेटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ इन इंडिया’ विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजातील महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. माता आणि बालमृत्यू, बालकांमधील आजार कमी करण्यासाठी समाजात प्रबोधन होणे आवश्यक आहे. गरोदर महिला आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य सेवकांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे जेणेकरुन योग्य आरोग्य सेवा पुरवणे शक्य होईल. 
राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातदेखील आरोग्य सेवेचे काम होणे आवश्यक आहे यासाठी स्थानिक बोलीभाषेचे ज्ञान असलेले आरोग्यसेवकांची मदत घेण्यात यावी. महिलांचे आरोग्य व स्वास्थ्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मोठया प्रमाणात कार्य करणे गरजेचे आहे. महिलांना स्वच्छतागृह व शुध्द पेजजल सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्नशील रहावे.  महिला व बालकांमधील आजाराची मुख्य कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी समाजात आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे. कुटुंबातील महिलांना सकस आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर  त्यांचे स्वास्थ्य अवलंबून आहे. प्रत्येकाने कुटुंबातील महिला व बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक   असल्याचे सांगितले.

  
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, महिला आणि बालक  समाजातील महत्वाचा घटक आहे, त्यांचे आरोग्य आणि उपचाराबाबत सजग राहणे आवश्यक आहे.   मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून ’ब्लॉसम’ उपक्रमाच्या माध्यमातून दूर्गम भागातील लोकांच्या आरोग्यासंदर्भात स्वयंसेवकांच्या मदतीने कार्य सुरु आहे. 
          
विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ’टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोर मॅटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ इन इंडिया’ विषयावर डॉ. अर्पणा हेगडे यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण ठरेले असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले.  विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेसाठी विद्यापीठ संशोधन विभागाचे प्राध्यापक  ब्रिगे. डॉ. सौरव सेन, डॉ. वैशाली गंभीरे, डॉ. प्रदीप आवळे यांनी काम पहिले.  या व्याख्यानमालेस महाराष्ट्र पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक व विद्यापीठातील अधिकारी मोठया संख्येने  उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...