Skip to main content

रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी; महिलादिनीच आपच्या महिलांचे गॅस दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन

नाशिक|केंद्र सरकारने केलेल्या गॅस  दरवाढीच्या निषेधार्थ  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपच्या महिला कार्यकर्त्यांनी चूल मांडून त्यावर भाकरी थापल्या शेकल्या आणि महागाईचा निषेध केला. महिलादिनीच रस्त्यावर केलेल्या या आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधले. महागाई कमी करावी आणि शेतमालाला भाव मिळावा अशा घोषणा आम आदमी पार्टीतर्फे देण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
Protest-against-gas-price-hike-on-Womens-Day-itself
केंद्र सरकारतर्फे दर चार ते पाच महिन्यांनी गॅस दरवाढ केली जात आहे. सतत होणारी ही दरवाढ ही गरीब वंचित शोषित लोकांचे आर्थिक नुकसान करणारी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी आम आदमी पार्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूक मांडून त्यावर भाकरी थापून जेवणाचे दृश्य मांडून आप कार्यकर्त्यांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले, ज्या पद्धतीने उद्योगपती आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार ठेवतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, हा जो विद्यमान सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय चालला आहे. तो तात्काळ थांबविला गेला पाहिजे, शेतकरी हा अन्नदाता असून त्याने जर अन्न पिकवणे बंद केले तर देशात हाहाकार माजेल, त्याचीच सरकारने जर काळजी घेतली नाही तर तो पूर्णपणे कोलमडेल आणि देशातील अन्न व्यवस्था विस्कळीत होईल.

ह्यावेळी पूर्व विधानसभेचे अध्यक्ष योगेश कापसे, देवळाली विधानसभेचे अध्यक्ष गिरीश उगले पाटील, शहर युवा अध्यक्ष अमर गांगुर्डे, शहर युवा सचिव प्रदीप लोखंडे, उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष अभिजीत गोसावी, पूर्व महिला अध्यक्ष शेतांबरी आहेर, प्रसिद्धी प्रमुख चंदन पवार, युवा उपाध्यक्ष संदीप गोडसे, आणि पदाधिकारी मेघराज भोसले,अनिल फोकणे, नविंदर अहलुवालिया, दिपक सरोदे, नंदू ठाकरे, संतोष राऊत, चंद्रशेखर महानुभव, दिलीप कोल्हे, सुमित शर्मा, विश्वजित सावंत, निर्मला दाणी, शकुंतला वाघ, स्वप्नील घिया, शांताबाई बनकर, मंगला पोरजे ,पुष्पा विष्णू आहेर सखुबाई धुळे, मोना लक्ष्मण जाधव ,मीना महाले, प्रसिध्दी प्रमुख चंदन पवार यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...