Skip to main content

प्रेस कामगारांच्या 50 वारसांना मिळाली नोकरी

नाशिकरोड| आयएसपी- सीएनपी प्रेसमधील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांच्या फाईल मंजुरीसाठी प्रेस महामंडळाच्या दिल्लीतील मुख्यालयात पाठविण्यात आल्या होत्या. प्रेसमध्ये सेवेत घेण्याची ऑर्डर निघण्याची प्रतिक्षा दोन्ही प्रेसमधील कामगार बांधवांना आणि वारसांना होती. आज ही प्रतिक्षा संपून ५० वारसांना ऑर्डर मिळाल्या. त्यामुळे प्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आयएसपी-सीएनपीमधील ५० वारसांना नोकरीवर घेण्यास परवानगी देणा-या ऑर्डर प्रेस महामंडळाच्या संयुक्त महाव्यवस्थापक अभिषेक श्रीवास्तव यांच्या सहीने आज सायंकाळी आयएसपी मजूर संघाला मिळाल्या. त्यानंतर मयत कामगारांच्या वारसांनी, दोन्ही प्रेसमधील कामगारांनी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कामगार पॅनलचे राजू जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, खजीनदार अशोक पेखळे, सहसचिव अविनाश देवरूखकर, संतोष कटाळे आदींचे आभार मानले. या वेळी आनंदोत्सव साजरा करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आयएसपीमध्ये २६ व सीएनपीमध्ये २४ मयत कामगारांचे वारस आयएसपी-सीएनपीमधील नोकरीवर रुजू करण्याची आवश्यक वैद्यकीय व अन्य कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्वरीत रूजू होतील. प्रतीक्षा यादीतील पुढील वारसांना देखील लवकरात लवकर कामावर घेण्यासाठी आयएसपी मजदूर संघ कार्यरत असल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले.

अगोदर कामावर रूजू झालेले ७७ मयत कामगार वारस व आज ऑर्डर आलेले ५० अशा एकूण १२७ मयत कामगार वारसांना प्रेसमध्ये नोकरी मिळाली आहे. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सुरू करण्यात आलेल्या कम्पॅशनेट अपार्ईन्टमेंट पॉलिसीमुळे हे शक्य झाले. हे आयएसपी-सीएनपी मजदूर संघाचे मोठे यश असल्याचे जुंद्रे यांनी सांगितले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...