Skip to main content

कमिशन वाढ, ईपॉस मशीच्या अडचणी दूर करू: फेडरेशनच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई| महाराष्ट्रातील रेशनिंग दुकानदाराच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात फेडरेशनच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री, पुरवठा मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी दुकानदारांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करावी आणि धान्य वितरणात ईपॉस मशिनमध्ये येणाऱ्या अडचणी दूरकरण्याविषयी मुंबईत चर्चा झाली. दुकानदारांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, अशी माहीती महाराष्ट्र शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी दिली.
Commission-increase-epos-machine-issues-will-be-resolved-Deputy-Chief-Minister-assures-federation-delegation

रेशनिंग धान्य दुकानदार प्रश्नांबाबत दोन दिवस महाराष्ट्र फेडरेशनच्या शिष्टमंडळाने पाठपुरावा केला. बुधवारी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजितदादा पवार, पुरवठा मंत्री  छगनराव भुजबळ, विधानसभा उपाध्यक्षा नरहरी झिरवाळ यांची मुंबईत भेट घेतली. यादरम्यान २०१७ ते २०२४ असा गेल्या सहा, सात वर्षापासून कमिशनमध्ये वाढ केलेली नसल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

कमीशन वाढ लवकर करण्यात यावी, ईपॉस मशीन वारंवार बंद पडणे, मशीनचे सिमकार्ड काम करत नाही, कॅश मेमो लवकर निघत नाही, नेटवर्क मिळत नाही या सर्व अडचणी तात्काळ सोडवाव्या आणि ईपॉस मशीनवर तात्काळ धान्य टाकावे अशी मागणी करून त्याचा आदेश शासनाने द्यावा आदी प्रश्नांबाबत चर्चा झाली. त्यावर उपमुख्यमंत्र्यानी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे डोळसे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी डोळसे पाटील यांच्यासह बाबुराव म्हमाने, अशोक एडके, संजय पाटील, सुभाष मुसळे, शांताराम पाटील, निवृत्ती कापसे, गुलाब वाजे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. 




Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...