Skip to main content

तीन महिन्यात हरवलेली ४१४ मुले कुटुंबाच्या हवाली

नाशिक रोड|प्रतिनिधी|मध्य रेल्वेच्या ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमेला मोठे यश मिळत आहे. या मोहिमे अंतर्गत कौटुंबिक वाद, किरकोळ कारणावरून घरातून पळून जाऊ पाहणा-या ४१४ लहान मुलांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप हवाली करण्यात आले. ऑगस्ट ते ऑक्टोबर २४ या तीन महिन्यात वाट चुकलेल्या ४१४ मुलांना कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.



काही मुले भांडण, कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या, शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता नाशिक रोड आदी रेल्वे स्थानकावर येतात. तेथून रेल्वेने मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाऊ पाहतात. रेल्वे स्थानकावर बावरलेली, भुकेलेली, थंडीत कुडकुडत रडवेली झालेली अशी मुले, मुली रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि नन्हे फरिश्तेचे स्वयंसेवक हेरतात. हे प्रशिक्षित कर्मचारी विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुलांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांकडे पुन्हा जाण्यासाठी प्रबोधन करतात. या उदात्त सेवेबद्दल पालक रेल्वे आणि स्वयंसेवी संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) रेल्वे स्थानकात चोवीस तास गस्त घालत असते. या दलाकडे रेल्वे व प्रवाशांची मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.



 याशिवाय ते कुटुंबियांशी किरकोळ वादातून घरातून दुस-या शहरात पळून जाऊ पाहणा-या मुलांच्या सुटकेसाठी मोहिम राबवत असतात. त्यासाठी ऑपरेशन नन्हे फरिश्तेतंर्गत अन्य स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली जाते. १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत या दलाने एकूण ४१४ मुलांना (३०६ मुले आणि १०८ मुली) त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले.


सुटका करण्यात आलेल्या मुलांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.



ऑगस्ट-२०२४

९७ मुलगे आणि ४४ मुली- एकूण १४१ मुले

सप्टेंबर-२०२४

१२५ मुलगे आणि ३५ मुली- एकूण १६० मुले

ऑक्टोबर-२०२४

८४ मुलगे आणि २९ मुली- एकूण ११३ मुले

 

एकूण मुलगे –   ३०६

एकूण मुली –     १०८

एकूण मुले- ४१४*

 


 


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...