Skip to main content

फडणवीस अन् मनकवडे मोदी?

फडणवीस अन् मनकवडे मोदी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका सुरू असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथून महाराष्ट्राच्या प्रचाराचा श्रीगणेशा करून निवडणुकीची रंगत वाढवली आहे. धुळ्याच्या सभेत मोदी यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधले. विकासासाठी केंद्रात सत्ता दिली तशी महाराष्ट्रात ही भाजपा महायुतीला द्या, आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील इच्छा  पूर्ण करू असे जनतेला आश्वासन दिले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील प्रचारादरम्यान अमित शहा यांनीही पंतप्रधानाच्या आश्वासनाची री-ओढत याचा पूनर्रउच्चार केला. अन् फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे सूतोवाच असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले गेलेे. 

मोदी-शहा यांनी महाराष्ट्रात येऊन असे संकेत दिले, त्याला अनेक घडामोडींची पार्श्वभूमी आहे. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होता होता फडणवीस यांना अचानक उपमुख्यमंत्री व्हावे लागले, ते तयार नव्हते पण सरकारवरील पक्षांची पकड राहावी यासाठी शहा यांनी काढलेल्या समजुतीनंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास राजी झाल्याचे बोलले जाते. फडणवीस यांची हीच नाराजी दूर करण्याचा कदाचित प्रयत्न असावा. सध्या तरी महाराष्ट्रातील कार्यकर्ते, नेते यांचे मोहोळ असलेला फडणवीस यांचा सारखा दुसरा नेता नाही. चाणाक्ष आणि अभ्यासू ही आहेत. महाराष्ट्रातील राजकारणावर चांगली पकड आहे. 

म्हणून निवडणुकीनंतर ज्यांच्या जागा जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री होईल असे शहा बोलत असले तरी भाजपाचा मुख्यमंत्री असावा यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्यामागे भाजपा आमदारांचा मोठा त्याग असल्याचे सांगावे लागले, एक प्रकारे शिंदे यांना अप्रत्यक्षपणे त्यांनी यंदा भाजपचाच मुख्यमंत्री असेल याचा सूचक इशारा ही दिला. त्यासाठी संघ आणि भाजपचे कार्यकर्ते झटून कामाला लागल्याचे दिसत आहे. लोकसभेत संघाने प्रचारात भाग न घेतल्याने त्याचा फटका ही भाजपाला बसला. त्यामुळे भाजपा आता ताक ही फुंकून पेत आहे. संघ आणि कार्यकर्त्यांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे.

२०१९ विधानसभा निवडणूकीत १०५ जागा आणि सर्वाधिक ३७ टक्के मते भाजपाला होती, त्यामुळे भाजपची रणनीती त्यादृष्टीने सुरू आहे. फडणवीस यांची मन की बात शहा- मोदी यांनी हेरली असून कदाचित मनकवडे मोदी यांनी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छापूर्ण करण्यासाठी जनतेला भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचे आवाहन केले असावे. त्यात त्यांना कितपत यश मिळते हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...