Skip to main content

बाप नव्हे, काकाच पूर्ण करणार; जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

नाशिक| राज्याचे उपमुख्यमंत्री सांगलीत गेले म्हणाले, यांनी जेवढ्या घोषणा केल्या त्या यांच्या बापकडून ही पूर्ण होणार नाही, अरे बापाचा विषय नाही या घोषणा तुझा काकाच पूर्ण करणार तुम्ही चिंता करू नका असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.


नाशिक येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मखमलाबाद येथे जाहीरसभा झाली. विरोधकांचा समाचार घेतांना ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते पंडित पिंगळे, श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, अजय बागुल, गोकुळ पिंगळे, गणेश गिते आदी उपस्थित होते.


लोकसभा निवडणूक झाली, महायुती घाबरली दिसेल त्याला घेतले, सरकार जाणार म्हणून ५० ते ३० हजार कोटींचे निर्णय घेतले. जाहिरात देऊन कामे केल्याचा बनाव केल्याचा आरोप पाटील यांनी केला. लोकसभेत आधी बहिणीला त्रास दिला, पाडायचा प्रयत्न केला, पाडण्यासाठी टोकाच्या भाषेचा वापर केला. आता लोकसभा निवडणुकीनंतर सर्व बहिणी लाडक्या झाल्या. महाराष्ट्रातील बहिणी एवढ्या येड्या नाहीत, त्यांना सगळे कळते आम्ही कशामुळे लाडक्या झालो आहे. हे सावत्र भाऊ आहे याची जाणीव झाली. सध्या राज्य त्यांचे आहे म्हणून तुम्ही गप्प आहात म्हणून आपण सख्या भावाचे राज्यात सरकार आणाल असा विश्वास ही पाटील यांनी व्यक्त केला.


महागाईने उच्चांक गाठला आहे. पाचशेवरून दिवाळी खर्च २० हजारावर पोहचला आहे. त्यातही २० हजारात ७० टक्केच दिवाळी साजरी करावी लागते. सगळ्या वस्तू महाग झाल्या. महायुतीच्या काळात महागाई डबल झाल्याची टीका त्यांनी केली. राज्यात बेरोजगारी वाढत आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातमध्ये गेले. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चकार शब्द ही काढला नाही. १७ उद्योग महाराष्ट्रातून गुजरातेत गेले, फॉक्सकॉन त्यापाठोपाठ टाटा - एअरबसच्या प्रकल्पाचे उद्घाटन होऊन प्रकल्प उभारला गेला, पाच-पंधरा हजार नोकऱ्या उपलब्ध होऊन वीस-पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेली, मी मुख्यमंत्र्यांना विचारले सगळे तिकडे चालेल आहे. मुख्यमंत्री म्हणाले मोदींना सांगून यापेक्षा ही मोठा प्रकल्प देतो. मात्र मुख्यमंत्र्यांची मुदत संपली आता लक्षात आले की भोपळा मिळणार आहे. एक ही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. मोदी -शाह यांनी सर्व प्रकल्प गुजरातला पळवून महाराष्ट्राला अधोगतीकडे नेल्याचा आरोप केला. महिंद्राचा प्रकल्प जाणार होता आम्ही पत्रक काढायला लावून तो बाहेर जाण्यापासून रोखला. हिंजवडी आयटी इंडस्ट्री राज्याबाहेर नेण्याचा घाट घातला. उद्योग यावेत रोजगार वाढावे याकडे याचे लक्ष नसल्याचे त्यांनी सांगितले.


महाराष्ट्र आणि गुजरात याची तुलना करायची झाली तर मी अर्थमंत्री असताना दरडोई उत्पंनात महाराष्ट्र गुजरातच्या वरती होता. गुजरात दरडोई उत्पन्नात खाली म्हणजे मागे होता. महाराष्ट्रात दिल्लीत मोदी फडणवीस याचे सरकार आले आणि दोन वर्षात महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात खाली आला, गुजरात ५ व्या आणि महाराष्ट्र्र ६ व्या क्रमांकावर घसरला असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. दरडोई उत्पन्न वाढीने गुजरातची माणसे श्रीमंत झाली तर महाराष्ट्रातील माणसे उत्पन्नात कमी पडली. राज्याच्या स्थापनेपासून आम्ही कधी खाली गेलो नाही, महाराष्ट्राला खाली नेत दिवाळी खोरीकडे नेण्याचे पाप महायुतीने केले. भारतातील सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा हा पंधरा ते साधे पंधरा टक्के होता. आता तो घसरून १३ टक्क्यांवर गेला २ टक्क्यांनी ते कमी झाले.


डबल इंजिन सरकारच्या काळात महागाई वाढली. मोटार सायकलवर २८ टक्के जीएसटी लावला. श्रीमंतांच्या हेलिकॉप्टरवर खरेदीवर केवळ ५ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे त्यांनी सांगितले. गरिबांवर २४ ते २८ टक्के कर आणि श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी कर कमी करणारे सरकार असून हे सरकार आता जायला हवे, यांच्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे.


जयंत पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे


*आया- बहिणी सुरक्षित नाही, बदलापूर सारख्या घटना घडत आहे. या घटनेत शाळा मालकाला वाचवण्याचे प्रयत्न याच्या सरकारने केले. भाजपा आमदार गणपत गायकवाड याने पोलिस ठाण्यात जाऊन गोळीबार केला. तो जेलमध्ये गेल्यावर त्याच्या पत्नीला यांनी उमेदवारी दिली.


* मोदींनी ७० हजार कोटीचा घोटाळा काढला. आमची सर्व टोळी तिकडे गेली, कोणी ही थांबले तयार नाही. मला ही म्हणाले चला इथे काही खरे नाही. मात्र मी शरद पवार साहेबांसोबत राहणार अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राला संपत्ती, पैसा यापेक्षा निष्ठा, प्रामाणिक पणा महाराष्ट्राला आजही अभिप्रेत आहे.


*भाजपा साधन सुचीतेचा पक्ष आहे. ज्यांनी ७० हजार कोटींचा आरोप केला. आर आर पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी लावल्यावर फाईल त्यांच्याकडे आली. त्यांनी सही केली. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी सही केली नाही. त्यानंतर नवीन सरकार आल्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली. आणि अजित पवार यांना बोलावून आर आर पाटील यांनी सही केल्याचे दाखवले पण त्यावर तुमची ही सही होती त्याचे काय असा प्रश्न उपस्थित करुन अजित पवार यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.

*भाजपाच्या अनेक गोष्टी बाहेर काढल्याने नवाब मलिक यांना जेलमध्ये पाठवले. त्यांच्यावर दाऊदशी संगनमत केल्याचा आरोप करत देहाद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या मलिकाना अजित पवार यांनी उमेदवारी दिली. एकावर एक फ्री म्हणून त्यांच्या मुलीला ही उमेदवारी दिली. आता हे सर्व भाजपाला मान्य आहे का? असा सवाल त्यांनी केला.


आमचे सरकार आले की या घोषणा आम्ही पूर्ण करणार


*महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणणार त्यात त्यांना ३ हजार रुपये आमचे सरकार देणार


*सर्व महिलांना एसटी प्रवास मोफत देणार


*यापूर्वी आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे २ लाख कर्ज माफ केले. शेतकऱ्यांना यापुढे ही मदत करणार


*सर्व कुटुंबाला २५ लाखांचा विमा देणार

*१० ताखेला आमचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे असे त्यांनी सांगितले.




Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...